Popular Posts

Tuesday, November 18, 2014

" एका मेंढपाळाचा शेवटचा दिवस..."



                 आकाशात मेघ दाटुन आले होते, अत्यंत जीव घाबरवुन टाकणारा वारा चालु होता, विजाच कडकडाट होत होता, मुसळधार पाऊस थोड्याच वेळात चालु होणार असे चित्र पहावयास मिळत होते. या निसर्गाच आक्राळविक्राळ रुप पाहुन कोणत्याही मानसच नव्हे तर जंगलात राहणारी जनावरे पण सैरावरा पळायला लागली होती. याच वातावरणामध्ये शेतकरी आपल्या शेतामधुन लवकरात लवकर सावरासावर करुन आपपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. जंगलात असणारे जंगली प्राणी पण निसर्गाचे हे आक्राळ विक्राळ रुप पाहुन सैरावैरा पळत होते. पण त्याच परिसरात हे सर्व चित्र शांतपणे पाहत एक मेंढपाळ आपली मेंढर चारत होता. त्याला या माझ्या आक्राळ विक्राळ रुपाची भिती वाटत नाही का? हा प्रश्न निसर्गाला पण निर्मान झाला होता. तो या वातावरणाचा एक अनोखा आनंद घेताना दिसत होता. त्या मेंढपाळाचे या निसर्गाशी काहीशे जन्मोजन्मीचे नाते असल्यागत तो वागत होता. त्याचवेळेस अपेक्षित असलेला पाऊस हा धोधो बरसु लागला. त्याच्या सर्व शेळ्या मेंढर ही त्या मेंढपाळाच्या भोवती जमा व्हायला लागली.
                    मेंढपाळ त्या मेंढरांना आपल्या भोवती घेउन पालकांची माया त्या मेंढरांना देउ लागला. पण हे सर्व करताना त्या पावसाच्या पान्याने खुल्या मनाने तो आपल्या अंगाने न्हावुन निघत होता. विजांचा कडकडाट अत्यंत अक्राळ विक्राळ असल्यामुळे अनेकांना तो विजांचा कडकडाट बघता घाबरगुंडी उडुन जात होती. पण तो मेंढपाळाला पाऊस चालु असताना निसर्गाच सुंदर चित्र अनुभवापासुन तो विजांचा कडकडाट पण थांबवु शकत नव्हता , अस बर्याच वेळ चालत होत त्या मेंढपाळाची मेंढर पण त्या पावसाची आनंदाने मजा घेत होती. काही वेळाने निसर्गाने पण शांततेच रुप घेत आपल आक्राळ विक्राळ रुप थांबवचा निर्णय घेतला होता अस दिसायला लागल होत. पाउस थांबला, विजांचा कडकडाट बंद झाला व सुंदर अस निसर्गाच रुप तिथ दिसायला लागल, फुलपाखर उडत होती , वन्य प्राणी सैरावैरा पळत होती, झाडांच्या पाणावर थांबुन असलेले पाण्याचे थेंब हे मोत्या प्रमाने चकाकत होते.
                    पाऊस थांबला होता तसी ती मेंढपाळाची मेंढर मेंढपाळापासुन दुर होऊन आजुबाजुला चरायला लागली. ती मेंढर अत्यंत शांत प्राणी, त्या मेंढरापासुन ना कोण्या वन्य प्राण्याला त्रास होत होता तर ना की कोणत्याही व्रुक्षाला ती खात होती. त्यांच लक्ष होत फक्त त्या निरुपयोगी जंगलातील गवतावर. तस तर ते गवत प्राण्यांच्या खाण्याऐवजी कशासाठीही उपयोगी नाही पण ते गवत मोठे होउन वाळल्यानंतर जंगलात लागण्यार्या वणव्याला नक्कीच कारणीभुत असते. व त्या वणव्यामध्ये अमुल्य असणारी नैसर्गिक साधनसंपतीच नुकसानच होते. गवत खात मेंढर आपल पोट भरतात व नैसर्गिक साधन संपत्तीच रक्षन पण करत असतात. तो निष्पाप मेंढपाळ त्या मेंढरांवर लक्ष ठेवत त्यांच्या मागे फिरत होता. सुर्याने आपली दिशा बदवायला सुरुवात केली होती व तो आता सुर्य डोक्याचा पलीकडे गेला होता. त्या मेंढपाळा जवळ एक फाटकाफुटका कापड होता व त्या कापडामध्ये काहीतरी बांधलेले होत , थोड्याच वेळाने तो कापड खोलत त्यामधुन त्याने त्याची मिठ, मिरची, भाकर, कांदा ही न्याहारी काढली व ती चालत चालतच खाण्यास पण सुरुवात केली. काहीच वेळात त्याने ती खाउन संपवली , पाणी पिऊन आपली मेंढर चारायला पुन्हा सुरुवात केली.
                   आता मेंढर चारत चारत संध्याकाळ व्हायला लागली होती तेव्हा त्याने आपल्या जंगलात असलेल्या राहुटी कडे आपली मेंढर वळविण्यास सुरुवात केली. तो मेंढर चारत चारत डांबरी करण असलेल्या रस्त्याकडे तो आला.मेंढपाळ आपली मेंढर ही त्या रस्त्यावरुन जात होती. तेवढ्यात त्या रस्त्यामधुन एक चारचाकी गाडी आली तेव्हा त्या चारचाकीमधुन चार व्यक्ती उतरले, तेव्हा त्या व्यक्तींनी त्या मेंढपाळांना आवाज दिला. मेंढपाळाने आपली मेंढर थांबवत तो चार व्यक्तींकडे गेला.
तेव्हा व्यक्तींनी त्या मेंढपाळाला ईकडे काय करत आहे म्हणुन विचारले तेव्हा मेंढपाळाने मी माझी मेंढर घेउन मी माझ्या राहत्या राहुटीकडे जात आहे म्हणुन सांगितले व त्यांना तुम्ही कोण आहात म्हणुन विचारणा केली.
 त्या लोकांनी ती वनकर्मचारी असल्याबाबत सांगीतले व त्यांनी त्या मेंढपाळाला दोन हजार रुपयाची मागणी केली.
पण कशाचे दोन हजार रुपये ? मेंढपाळाने वनकर्माचारांना विचारणा केली.
 तु तुझे मेंढर वनहद्दीत चारल्यामुळे आम्ही तुला दंड करतोय? , वनकर्मचाराने म्हटले.
मी कोणतही जंगलाच नुकसान केलल नाही, कोणत्याही वृक्षाला, वन्य हानी प्राण्याला हानी पोहचवली नाही व सध्या माझी मेंढर कोणत्याही वनहद्दीत नाही मग कशाचा दंड? मेंढपाळाने विचारले.
मुक्याट्याने पैसे देतोस की टाकु तुझी मेंढर उचलुन वनहद्दीत व काढु फोटो मग तुला दंड नाही होणार तर पुर्ण तुझी मेंढर हर्आस होतील.
तो मेंढपाळ घाबरला, दयावया करु लागला , माझ्या कड पैसे नाहीत साहेब माझ्यामेंढरांना सोडा म्हणुन जोरजोराने रडु लागला. पण त्या निर्दयी कर्मचार्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही,
                    त्यांनी त्या मेंढपाळाची मेंढर जबरदस्तीने उचलुन वनहद्दीच्या क्षेत्रात टाकली. व फोटो काढुन ती मेंढर गाडीत भरुन शहराच्या दिशेने नेली. पण तो मेंढपाळ तिथेच होता, तो रडत नव्हता, हसत नव्हता फक्त तो शांतपणे भविष्याचा विचार करत होता. कारण त्याच्या उपजिवेकेचे साधन ती वनकर्मचारी घेउन जात होती. आता आपली मुलबाळ काय खाणार , ती कशी जिवण जगणार हाच तो विचार करत होता. कारण नाही त्याच्याजवळ घर होत, ना की त्याच्या जवळ कसण्याकरता शेत होत. आता आपल्या मुलांबाळासहीत विष पिल्या शिवाय पर्याय नाही कारण आपण ती हर्आस केलेली ती मेंढर पुन्हा घेउ शकत नाही. हा विचार त्याच्या डोक्यात येत होता तरीही तो त्या रस्त्यावरच शांत बसला होता पण त्याने त्याची पावले ही घराकडे वळवली नव्हती , आता तो काय करणार हे फक्त त्याच्या मनालाच माहीत होत.........

(या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन घेतला आहे.)



संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare


Monday, November 17, 2014

कधी समजणार समाज या निरागस प्रेमाला ?..

                      "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. असच काही प्रेमाच नात त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये होत . ते दोघही अवघ्या दहाव्या वर्गामध्ये शिकत होते. वय जेमतेम १६-१७ वर्ष.ह्या निरागस वयामध्ये कोण आपल आणि कोण दुसर हे ही सहजासहजी कळतही नसत. दोघही एकाच वर्गात शिकत असताना सुद्धा एकमेकांना ओळखत नव्हते. शाळेच्याच एका कार्यक्रमामध्ये दोघांचीही ओळख झाली. ती ओळख पुढे वाढतच गेली, पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली , अनेक विषयावर चर्चा होउ लागली. यातुनच त्यांची मैत्री ही अधिकच घट्ट होत होत गेली .एकमेकांची मोबाईल नंबर पण त्यांनी शेअर करुन घरच्यांच्या लपुनछपुन ते एकमेकांसोबत बोलु लागली ,वर्गातील मुल-मुली पण त्या दोघाच्याबाबत आपपसात चर्चा करु लागली. त्या दोघांची मैत्री ही प्रेमात रुपांतर कधी झाली हे त्या दोघांना कळलच नाही.
                  ती दोघ आता जिवणातील अविस्मरणीय क्षण जगत होती त्यांना माहीत होत व ही क्षण पुन्हा येणार नाही त्यामुळे बिंधास्त अस जिवण जगत होती. त्यांना जगाची काहीही पर्वा नव्हती , कोण आपल्याबाबत चर्चा करत आहे, कोण आपली टिंगल उडवत आहे आणि कोण आपल्या मागावर आहे याची काहीही चिंता त्या दोघांनाही नव्हती ती दोघ फक्त प्रेम करु इच्छित होती. पण हे प्रेम हे अत्यंत निरागस, निस्वार्थी प्रेम होत या या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. जणु प्रेम म्हणजे देवाकडुन मिळालेली देण अश्याच प्रकारे ती दोघही जिवण जगत होती परंतु या प्रेमाचा परिणाम त्यांच्या शिक्षनावर काय होणार , त्याच्या जिवणावर काय होणार याबाबत विचार करायला दोघही तयार नव्हती कारण दोघही एकंमेकांच्या प्रेमात आकंठ डुबायला लागली होते. परंतु समाजात निरागस अस्या प्रेमाला जागा नसते अस म्हणतात.
                    म्हणुनच काय तर या दोघांच्या प्रेमाची बातमी ही मुलीच्या घरी पोहचली. ती बातमी पोहचल्यानंतर मुलीच्या घरचे अत्यंत संतप्त झाले. तो मुलगा असलेल्या ठीकाणी ते मुलीचे कुटुंबीय आले , त्त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तो मुलगा त्यांच्या जवळ गेला व आपण कोण आहात म्हणुन विचारु लागला. त्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी मुलीच्या कुटुबियांनी त्याच्या कानाखाली एक जोरात चपराक लगावली. त्याने मी काय केल म्हणुन विचारल तेव्हा त्याला ते त्या मुलींचे कुटुबिय असल्याचे कळले. त्याची खुप घाबरगुंडी उडाली, त्याला रडु कोसळल , त्याने त्यांची माफी मागण्याचा प्रतत्न केला. पण त्याची बाजु ऐकुन घेण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीही नव्हते, सर्व जण त्याच्यावर तुटुन पडले व त्यावा लाथा बुक्क्यांनी मारु लागले. तो रडत होता , गयावया करत होता, सोडा मला सोडा म्हणुन ओरडत होता पण त्या निर्दयी लोकांना त्या गयावया करण, रडण, मला माफ करा मला सोडुन द्या यापुढे असे होणार नाही असे ओरडत होते यातील एकही शब्द ऐकु येत नव्हता.
                      काही वेळानंतर त्याची मार खाण्याची क्षमता संपली व तो बेशुद्ध होउन त्या रस्त्यावर पडला. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रस्त्यावर तसेच सोडुन मुलीचे ते कुटुंबीय आपल्या घरी निघुन गेले. तो १६-१७ वर्षाचा निरागस मुलगा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता पण त्याला उचलायला कोणही समोर आल नाही. काही वेळाने त्या मुलांच्या कुटुंबियांना माहीती पडल व त्यांनी त्या मुलाला उचलुन दवाखाण्यात नेल. मुलांच्या कुटुंबिय पण त्या मुलींच्या कुटुबियाना मारायला निघाले पण त्या मुलाच्या वडीलांनी त्यांना थांबवल. व झाल ते झाल पण आता हे प्रकरण आपल्याला वाढवायच नाही आहे कारण हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचल्यास माझ्या मुलाच जिवण हे उद्वस्त होउ शकत म्हणुन आपल्या शांत राहायच आहे. पण मुलींच्या कुटुबियांनी हा विषय इथेच बंद न करता त्या मुलीचे शिक्षन सोडवले व त्या मुलीवर अनेक निर्बंघ लादल्या गेले. व त्यानंतर कधीही त्या मुलाची व मुलीची भेट झाली नाही.........
                    या निरागस, निस्वार्थी प्रेमाचा असा शेवट का झाला की त्या मुलाला दवाखान्यात अति दक्षता कक्षा मध्ये रहाव लागल, मुलीला आपल्या हक्काच्या शिक्षनापासुन मुकाव लागल. आजचे पालक एवढे निर्दयी आहेत का ? की ते एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलाला एवढ बेदम मारहान करु शकतात , आपल्या स्वताच्या मुलीला शिक्षण सोडण्यास कारणीभुत ठरु शकतात , आपल्या मुलीवर अनेक निर्बंध घालु शकतात....
खर तर हा प्रश्न दोघांनाही समजुत देउन, शिक्षकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लावुन, किंवा दोन्ही कुटुंबियांनी आपपल्या मुलांना समज देउन, प्रेमळ अशी दमदाटी करुन सोडविता आला पण हा प्रश्न सोडवण्या करीता जो काही मार्ग अवलंबविला गेला तो दोन निरागस मुलांच्या जिवणाचा अस्त ठरला. आपला समाज हा अत्याधुनिक जगाबरोबर जगतो आहे की तो आजही सोळाव्या सतराव्या शतकात जगत आहे हा मोठा प्रश्न आहे.......

(या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन घेतला आहे)


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare

Sunday, November 16, 2014

"स्वच्छ भारत अभियानात निस्वार्थी सहभाग की पब्लिसिटी स्टंट ?..."



                    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे.
                    मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण मोठमोठ्या उद्योजकांना, सिनेस्टर, क्रिकेटर व राजकीय नेत्यांना स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होण्याकरीता निमंत्रण पाठवत आहे. ते पण कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होत आहे अशी चर्चा होत आहे. पण हेच सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक हे रस्त्यावर येतात झाडु हातात घेऊन मिडीया समोर तो झाडु मारतात. व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. व हीच काही वेळ केलेली सफाई दिवस भर ईलेक्ट्रानिक्स मिडीयावर झळकत असते. तसेच वृत्तपत्राच्या पहील्यापानावर ती बातमी छापुन येते व काही वेळ कचरा साफ करणार्या त्या व्यक्तींना कितीतरी पटीने मिडीया मोठ करते. पण याच मिडीया वाल्यांना शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या, रोज कचरा साफ करणार्या कामगरांना, निस्वार्थीपणे स्वच्छता अभियान राबवणार्या व स्वच्छतेचा संदेश देणार्या व्यक्तींना दाखवयाला मिडीयाजवळ वेळ नाही.
                     माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कचरा नसलेल्या रस्त्यावरची साफसफाई करणार्या व्यक्तींचे कौतुक करतायत हे पण आश्चर्यच आहे, कारण हे सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक स्वच्छ भारत अभियानाला राबवायला काही वेळासाठी नगरामध्ये येतात व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. पण या सर्व सेलीब्रिटी येण्याच्या आधी फटाके फोडल्या जातात, गेल्यानंतर पण फटाके फोडल्या जातात त्यामुळे तिथ फटाक्यांचा कचरा, मिनरल वाटर च्या बॉटलचा कचरा असा अनेक प्रकारचा कचरा ती लोक गेल्यानंतर तसाच पडुन राहतो. फटाक्यांच्या आवाजामुळ ध्वनीप्रदुषण पण होते. तसेच त्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्मान होत आहे.
                       भारत स्वच्छ अभियानामध्ये साध्या गावाच्या सरपंचापासुन मंत्र्यांपर्यंत तसेच अनेक क्षेत्रातील सेलाब्रिटी स्वताची प्रसिद्धी वाढवुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विचारु ईच्छितो आपण नॉमिनेटेड केलेल्या सेलीब्रिटी स्वताच्या घरात झाडु मारण्या करीता मोलकरीण ठेवतात पण ते कधीही झाडु हातात घेत नाही. हे सेलीब्रिटी
स्वताच्या स्वार्थासाठी, स्वताला आणखीन प्रसिद्धी मिळवुन देण्याकरता स्वच्छ भारत अभियानामध्ये सामिल होत आहे. जर ते निस्वार्थीपणे भारत स्वच्छ अभियानामध्ये सामिल होउ ईच्छित असते तर ते कोणताही गाजावाजा न करता , कोणत्याही मिडीयाला न सांगता त्यांनी रस्त्यावर झाडु मारला असता व हा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम आपल्या व्यस्त जिवणातील थोडा वेळ काढुन नित्यक्रमाप्रमाने राबविला असता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरच जर स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायच असेल तर त्यांनी त्या लोकांच्या नावाचा सत्कार करायला हवा ज्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही व जे नेहमी नित्यक्रमाने रस्ते, गल्ली साफ करतात व कमीत कमी आपल घर व परिसर स्वच्छ ठेवतात कारण प्रत्येकाने आपल घर सुधारल तर आपला देशच नव्हे तर जग सुधारु लागते..............

(ह्या पोस्टमधील फोटो  इंटरनेट वरुन घेतलेला आहे)



संजय राजु कोकरे
रा.अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो.नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Sanjaykokre.blogspot.com

Saturday, November 1, 2014

महाराष्ट्रमध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?...



                     "महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एक महान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एक मोठा प्रश्न निर्मान होतो. भारतामधील कोणत्याही प्रांतात राहणार्या व्यक्तीला दुसर्या कोणत्याही प्रांतात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, हे आम्हालाही मान्य आहे. पण जो माणुस ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ज्याच्या वाडवडीलांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे तरी त्या मराठी माणसाला जिवण जगण्याकरता त्याच्याच जन्मस्थान असलेल्या राज्यामध्ये प्रथम प्राधान्य नसावे हे कुठपत योग्य आहे.
                    महाराष्ट्रामध्ये अनेक दुसर्या राज्यातील लोक येउन व्यवसाय करत आहे व एक आनंदी जिवण जगत आहेत, मराठी माणसाचा त्याला नक्कीच विरोध नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये आलेल्या परप्रांतीय लोकांसाठी मराठी माणसाचा काहीही विरोध नाही हे खरे असले तरी पण महाराष्ट्रामध्ये राहुन महाराष्ट्रीयन असल्याचा ते अभिमान बाळगत नसतील तर त्याचा तितकाच तिरस्कार मराठी माणसाला असेल. महाराष्ट्रामध्ये कोणीही हिंदु नाही तर मुसलमानही नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार्या माणसाचा धर्म आणि जात ही मराठी आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणुन १०० हुन अधिक लोकांनी बलीदान दिले आहे, तेव्हा कुठे मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्राला म्हणजेच मराठी माणसाला मिळाली. परंतु या मुंबई मध्ये आज अनेक परप्रांतीयांचे लोंढेचे लोंढे येत आहे, या लोंढ्याच्या गर्दीमध्ये मराठी माणुस हरवुन गेलेला दिसत आहे. मुंबई मराठी माणसाची हे परप्रांतीय लोंढे मानायलाच तयार नाही, कारण मराठी माणसाला गुलामगिरीची सवय झालेली आहे असा समज परप्रांतीय लोंढ्याचा झालेला दिसत आहे. परंतु मराठी माणुस शांत आहे पण षंढ नाही हे ही त्या परप्रांतीयांनी लक्षात घ्यायला हवे.
                   मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्या अनेक संघटना, राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या विषयावर अनेक पक्षांनी मतासाठी राजकारण केल. परंतु ते पक्ष मात्र या विषयावर पुर्णपणे यशस्वी झाले आहेत असे अजुन तरी दिसत नाही आहे. महाराष्ट्रामधील "मुबई मध्ये काय व्यवसाय करता? मुबंई मध्ये ट्राफीकजाम मध्येच तुमचा बराच वेळ वाया जातो, तुम्ही आमच्या राज्यात या आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा पुरवु " हे वाक्य आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेले. आमच्याच राज्यात येऊन, आमच्याच राज्यात गुंतवणुक करणार्या उद्योजकांना फुस लावुन पळवण्याचा प्रयत्न दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी कसा? हा ही एक मोठा प्रश्न निर्मान होत आहे.
                    मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रामध्ये कमी होताना दिसतेय तरीही मराठी माणुस हे सर्व कस काय सहन करतोय?, हा संशोधनाचा विषय बनला आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये कोण असणार? हे सर्व दुसर्या राज्यामध्ये राहणारे नेते ठरवत होते व ठरवत पण आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण राहणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ? हे मराठी माणुस का ठरवु शकत नाही, मराठी माणसाची बुद्धी एवढी षंढ झाली आहे का? की ती षंढ करण्याचा प्रयत्न परप्रांतीय लोक करतायत. ? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जरी मराठी माणुस असला तरी महाराष्ट्रामधील कोणतेही निर्णय घेण्याकरता त्याला दिल्ली कडेच का पाहावे लागते? हा ही एक मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील कोणताही निर्णय घेताना दिल्लीकडे बघावे लागणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेकडेच बघावे लागेल. असे सरकार महाराष्ट्रामध्ये कधी तरी येईल का?. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
                  महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नावर आक्रमक राहणार्या राज ठाकरे व उद्दव ठाकरे यांना मराठी माणसाच्या हिताकरता राजकीय स्वार्थ सोडुन एकत्र येण्यास काय हरकत आहे? हे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे आहे. मराठी माणसाला या दोघांकडुन बर्याच प्रमाणात अपेक्षा आहे, या दोघांच्या भांडणामध्ये मराठी माणसाचे मतांतर होउन मराठी माणसाचेच नुकसान होत आहे व परप्रांतीय समाजाचे लोक हे आपल्या मराठी माणसांमध्ये फुट पाडुन महाराष्ट्रावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतो आहे व आपल्याच माणसाला हाताशी धरुन तो राज्य करताना पण दिसत आहे. महाराष्ट्रामधील मराठी लोकांच्या अस्मितेला असणारा धोका टाळण्यासाठी मराठी माणसाला आपसातील भांडणे विसरुन एकत्र यावेच लागेल व मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये अस सरकार आणावे लागेल की ज्याचा मुख्यमंत्री कोण्या दिल्लीवरुन नाही तर महाराष्ट्राच्या एखाद्या शहरामधुन, गावामधुन किंवा गल्लीमधुन ठरवला जाईल .......

(ह्या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन  घेतला आहे)


प्रती,
          मा. संपादक साहेब,
          दैनिक __________
                    आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती.


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 09561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com

Monday, October 20, 2014

"महाराष्ट्रामधील २०१४ विधानसभा निवडणुकीतील धनगरांचे योगदान"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले व सर्वत्र कमळ च कमळ फुलु लागले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना व काल परवा पर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकणार्या नेत्याला पण अनपेक्षित असणार्या अस्या पराभवाला समोरे जावे लागले. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीप्रेणित युतीचे सरकार बसण्याचे चिन्ह दिसत आहे. भारतीय जनता पार्टीला जरी स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष म्हणुन अस्तित्वात आलेला आहे. भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षाला १२३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना या पक्षाला ६३ जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षाला ४२ जागा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला महाराष्ट्रमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाची साथ घ्यावी लागु शकते.परंतु यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेत्रुत्वात सरकार स्थापण होणार नक्की. महाराष्ट्रामध्ये २००९ विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ला ४६ जागावर व शिवसेना या पक्षाला ४४ जागावर विजय मिळाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महीन्या अगोदर महायुती असताना शिवसेना व भारतीय जनता पार्टी(मित्रपक्ष) या दोन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाला पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे धनगर समाज आरक्षन क्रुती समितीने भारतीय जनता पार्टी ला समर्थन दर्शविलेले होते व मा. महादेव जानकर याचा राष्ट्रीय समाज पक्ष हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन क्रंमाकावर असणार्या धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे वळला व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात अधिक जागा जिंकण्यात यशस्वी झाल्याची दिसत आहे अशी चर्चा महाराष्ट्रातील जनसामान्यांत आहे. भाजपाच्या या यशामध्ये सर्वात मोठा वाटा हा धनगर समाजाचा मतांचा आहे असे चित्र २००९ व २०१४ विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या तुलनेवरुन दिसत आहे. धनगर आरक्षणाला शिवसेनेने महायुतीमध्ये असताना पाठींबा दर्शवला होता व महायुती तुटल्यानंतर सुद्धा शिवसेनेने धनगर आरक्षनाला कधीही विरोध दर्शवलेला नव्हता त्यामुळे धनगर समाजातील लोकांचा भाजप नंतर शिवसेनेकडे मतदानाचा कल वाढला होता. त्यामुळे शिवसेनेला २००९ च्या विधानसभा जागा पेक्षा १९ जागा २०१४ विधानसभा निवडणुकींमध्ये जास्त जिंकणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रामध्ये ५५ ते ६० मतदारसंघामध्ये धनगर समाज ज्याला मतदान करेल तो उमेदवार निवडणुन येण्याची शक्यता असते तर बर्याच मतदारसंघामध्ये जरी फक्त धनगर समाजाच्या मतदानावर जरी उमेदवार निवडुन येत नसला तरी धनगर समाजाचे मतदान सम्पुर्ण मतदानाच्या टक्केवारीमध्ये प्रभाव टाकण्या इतपत असते व त्यामुळे तेथील उमेदवार हा धनगर समाजाच्या मतादानामुळे उमेदवार विजयानजिक पोहचण्याची शक्यता असते. बारामती मध्ये मा. पंतप्रधान मोदी यांची झालेली जाहीर प्रचारसभा व त्या प्रचार सभेमध्ये धनगरांची वेशभुषा असलेल्या पिवळा फेटा व घोगंडी यांचा मा. पंतप्रधान मोदी यांनी पेहराव करुन धनगरांच्या भावणांना त्यांनी हात घातला व धनगर समाजाने पण त्यांना आपला प्रामानिक पणा दाखवत फक्त भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराला मतदान केले व भारतीय जनता पार्टीने धनगर समाजावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत भारतीय जनता पार्टी ला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी धनगर समाजाने आपल्या परिने सर्व मदत केलेली दिसत आहे. त्याच प्रमाने शिवसेनेच्या २०१४ विधानसभा निवडणुकीच्या यशामध्ये धनगर समाजाचे बरेच योगदान आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी नागपुर मध्ये विधानसभा निवडनुकीआधी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषद मध्ये एका पत्रकाराने महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांना धनगर आरक्षनाबाबत प्रश्न विचारला असता मा. राज ठाकरे यांनी धनगर आरक्षनाबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे उमेदवार निवडुण आल्यास धनगर आरक्षणाचे कधीही समर्थन करणार नाही उलट धनगर आरक्षनाला त्यांच्यापासुन धोका निर्मान होऊ शकतो हा विचार धनगर समाजातील लोकांच्या मनात निर्मान झाला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या उमेदवारास धनगर समाजाच्या लोकांनी मतदान करण्यास विरोध केला व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला मागील विधानसभा निवडणुकी एवढ्या जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत व महाराष्ट्रामध्ये कसाबसा एका जागेवर मनसेला विजय मिळवता आला. धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणार्या वसंत पुरके, हर्षवर्धन पाटील व बबनराव पाचपुते या सर्व दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाटावी लागली. यावरुन महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाची राजकीय ताकद किती आहे ह्याची जाणीव महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षाला आता झालेली दिसत आहे. व यापुढे धनगर समाजाला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये राजकारण करता येणार नाही हे महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या लक्षात आलेले आहे. धनगर समाज हा ज्याप्रमाने भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठेने राहीला त्याच प्रमाने आता भारतीय जनता पार्टीने धनगर आरक्षनाचा प्रश्न जास्त प्रलंबीत न ठेवता धनगर आरक्षनाच्या प्रश्नाला प्राधान्य देत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षन देऊन भारतीय जनता पार्टी ने धनगर समाजाला न्याय द्यावा.................. . . संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Sunday, October 12, 2014

" वास्तव: रस्त्यावर राहणार्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट"

मी अमरावती मधील दस्तुर नगर या परिसरात माझ्या मित्राला भेट देण्या करता आलो होतो. सकाळ चे दहा वाजले असताना सर्व परिसरातील लोक हे आपल्या कामावर जाण्यासाठी चौकामधुन ये जा करत होते, त्याचप्रमाने सर्वच लहान मोठी मुल-मुली आपल्या शालेय गणवेशामध्ये शाळेत जाण्याकरता चौकामधुन ये-जा करत होती. माझा मित्राला दस्तुर नगर मध्ये यायला काही वेळ लागणार होता त्यामुळे हे सर्व चित्र बघत मी दस्तुर नगर मध्ये उभा होतो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या हाताला हात लावुन मला आवाज देण्याचा प्रयत्न करत होते, मी मागे वळुन बघितले असता अत्यंत घाणरडे असे कपडे घातलेली आठ - नऊ वर्षाची मुलगी व तिच्या हातात तिचीच एक दोन वर्षाची लहान बहीण घेउन आपले हात पसरुन मला भिक मागत होती. मला त्या दोघी बहीणींची दयनीय अवस्था बघुन मला दया आली व त्यांना मी दहा रूपये दिले. त्या मुली लगेच ते पैसे घेऊन माझ्या जवळुन दुर गेल्या.अश्याच प्रकारे भिक मागणारी बर्याच प्रमाणात मुलमुली त्या नगरामध्ये फिरत होते. ती मुल-मुली कोणालाही भिक मागण्याच आपल काम करत होती. कोणी त्यांना हाकलुन लावत होते तर कोणी त्यांना दयेच्या नजरेने बघुन त्यांना काही पैसे देत होते. माझ्या मनात आता पाच मिनटा पहलचे एक चित्र आठवत होते की आपल्या सुंदर अश्या शालेय गणवेशा मध्ये मुलमुली किती आनंदाने शाळेमध्ये जात होती तर ह्या भिक मागणार्या मुलामुलींना घालयला धड कपडे नव्हते. त्या शाळेतील मुलामुलींना अत्यंत स्वादीष्ट असा जेवणाचा डब्बा त्यांच्या आई वडीलांकडुन तयार करुन मिळत होता तर एकीकडे या काही मुलांना उष्ट्या अन्नासाठी पण दारोदारी फिरावे लागत होते. हा अत्यंत भयंकर असा अनुभव मला पहायला मिळत होता. प्राथमिक शिक्षणापासुन कोणतेही मुल-मुली वंचित राहू नये म्हणुन महाराष्ट्र शासनाने अनेक योजना लागु केल्या. त्या योजनांचा या मुलांना फायदा मिळवुन देण्यामध्ये महाराष्ट्र शासन सफशेल अपयशी ठरल्याचे यावरुन दिसत आहे. मी जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लिहीलेल एक वाक्य नेहमीच वाचत असायचो ते म्हणजे " आमच्या गावात कोणताही शाळाबाह्य विद्यार्थी नाही किंवा शाळ्यबाह्य विद्यार्थी दाखवा आणि बक्षीस जिंका". जर मग सर्वच गावांच्या परिसरातील सर्वच मुल ही शाळेमध्ये शिकत असतील तर मग ही रस्त्यावर भिक मागणारी मुल आली तरी कोठुन? या मुलांच्या या बिकट अवस्थेसाठी जबाबदार आहे तरी कोण? या मुलांची अशी बिकट अवस्था असणे म्हणजे महाराष्ट्र शासनाची हार नव्हे का? जेथे सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे म्हणायला महाराष्ट्राचे नेते विसरत नसतील तर ह्या मुलांकडे लक्ष द्यायला ह्याच नेत्यांना कसा काय विसर पडतो? सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालु आहे परंतु कोणत्याही पक्षाच्या उमेदवार या मुलांच्या समस्येबाबत ठोस पाउल उचलण्याचे वचन सामान्य जनतेला का देत नाही? ह्या सर्व मुल-मुली रस्त्यावर राहत असल्यामुळे त्याच्यासोबत अपघात होण्याची, काही दुर्घटना होण्याची किंवा ती मुलमुली गुन्हेगारीक्षेत्रा कडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी राज्य शासन या मुलामुलींच्या समस्ये कडे का गंभीर रित्या बघत नाही? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात यायला सुरुवात झाली होती परंतु तेवढ्यात माझा मित्र तेथे आला आणि आम्ही दोघे माझ्या मित्राच्या घरी जायायला निघालो परंतु माझ्यामनात आलेले ते सर्व प्रश्न अनुत्तरीच राहले......... परंतु आता या प्रश्नांचे उत्तर आता तुम्हा-आम्हाला महाराष्ट्र शासनाला विचारावे लागणार आहे. अत्यंत बिकट अवस्थेत रस्त्यावर जिवण जगणार्या व म्रुत्युच्या दाढेतच उभे राहुन आपला उदारनिर्वाह करणार्या या गरीब मुला-मुलींना आता आपल्याला आपुलकीच्या भावनेने मदत करावी लागणार आहे. आता मी फक्त एवढेच सांगेन "चला उठा भारताचे भविष्य असणार्या या मुलांना मदत करुया आणि शासनाला यांच्या असणार्या बिकट अवस्थेबाबत जाब विचारुया"......... संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Wednesday, October 1, 2014

"देशाचे राष्ट्रगीत महत्वाचे की राजकीय नेत्याचे भाषण?"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकींचे पडझम सर्वत्र वाजत आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन यावा म्हणुन प्रचार सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे व प्रचार सभेचा आवाज अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावा याकरता न्युज चॅनेल त्यांचे थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही परिसरात घेतली जाणारी प्रचार सभा ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे व त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावापर्यंतच्या लोकापर्यंत पोहचत आहे. प्रत्येक पक्षाचा पक्षश्रेष्ठी आपल्या भाषणातुन आपल्या पक्षाचा लेखाजोगा मांडत असतो व भविष्यामध्ये सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यास त्याचा पक्ष कोणत्या गोष्टी करण्यावर भर देणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दि. २८ सप्टेंबर २०१४ ला संध्याकाळला मा. राज ठाकरे यांची मुंबई येथे प्रचार सभा होती. त्या सभेमध्ये मा. राज ठाकरेंचे भाषन चालु होते व बर्याच मराठी न्युज चॅनल वर त्याचे थेट प्रक्षेपण चालु होते. मा. राज ठाकरे साहेबांचे भाषन संपल परंतु तेथील व्यासपिठावर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल असे जाहीर करण्यात आले. मी राष्ट्रगीताकरता उभा राहणारच तेवढ्यात त्या न्युज चॅनेलने त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपन बंद केले आणि आपले नविन बातमीपत्र सुरु केले. माझ्या मनात विचार येत होता की राजकीय पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे अर्धा ते एक तासाचे भाषणाचे प्रक्षेपण दाखवण्यात न्युज चॅनल काही अडचण नव्हती मग ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यात न्युज चॅनेल ला काय अडचण होती. एखाद्या राजकीय पक्षाचा पक्षेश्रेष्ठीचे भाषन भारताच्या राष्ट्रगीतापेक्षा न्युज चॅनेलला मोठे वाटते की काय? हा प्रश्न माझ्याचसाठी नव्हे तर महाराष्ट्रतील जनसामान्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. जी न्युज चॅनल निवडणुक काळामध्ये राजकर्त्यांच्या भाषनाचे थेट प्रक्षेपण करु शकते, राजकीय पक्षाच्या तसेच वेगवेगळ्या सौदर्य प्रसाधनाच्या जाहीराती दाखवु शकतात तेच न्युज चॅनेल ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यास का काटकसर करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेमधील पक्षश्रेष्ठीचे संपुर्ण भाषणाचे थेट प्रक्षेपण करायचे परंतु त्याच सभेतील राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपण बंद करुन नविन बातमीपत्र सुरु करायचे हे कितपत योग्य आहे? देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाचा अभिमान असावा व आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान देशातील प्रत्येक नागरिकाने करावा असे आपणा सर्वांचे मत असते. परंतु देशाच्या राज्यघटनेचा चौथा आधारस्तंभ असलेली मिडीयाच ज्यावेळेस असे क्रुत्य करते त्यावेळेस सामान्य जनतेकडुन काय अपेक्षा करावी हा मोठा प्रश्न निर्मान होतो आहे. ईलेक्ट्रानीक्स मिडीयाला राजकीय पक्ष हा देशाच्या राष्ट्रगीतापेक्षाही मोठा वाटतो का? मिडीयाला आपल्या देशाचा अभिमान आहे की नाही? असे अनेक प्रश्न देशातील सामान्य जनतेच्या मनात निर्मान होत आहे. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Monday, September 22, 2014

"जागा वाटपाचा गुंता की बंडखोरी रोखण्याची योजना....."


"जागा वाटपाचा गुंता की बंडखोरी रोखण्याची योजना....." महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची अंतीम तारीख ही २७ सप्टेंबर आहे . महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेसाठी मतदान हे १५ आक्टोंबर ला असुन विधानसभेचा निकाल हा १९ आक्टोंबरला लागणार आहे. परंतु आतापर्यंत महायुती आणि आघाडी मधील जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार?, कोणत्या पक्षाला सुटणार हे नक्की झालेच तर उमेदवार कोण राहणार?, आणि उमेदवार इतक्या कमी वेळात प्रचार तरी कोणत्या प्रकारे करणार? हे सर्व प्रश्न प्रत्येक मतदार संघातील जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभेमध्ये मिळालेला विजय हा मोदी लाटे मुळेच मिळाला आहे असा समज झालेल्या भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात पण या लाटेचा फायदा घेऊन आपल्याला अधिकाअधिक जागा जिंकता येतील व आपल्याला अधिकाअधिक जागा जिंकता आल्यास मुख्यमंत्री आपलाच असेल असे समज करुन भारतीय जनता पक्ष हा शिवसेना कडे महायुतीमधील जादा जागांची मागणी करत आहे. परंतु महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असुन येथे कोणत्याही एका व्यक्तीची हवा उपयोगात आणता येत नाही तर येथे फक्त विकासाचेच राजकारण उपयोगात आणता येते हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेतले पाहीजे आणि महायुती मधील जागावाटपाचा गुंता लवकरात लवकर सोडायला पाहीजे. 'महायुती मध्ये असणार्या घटक पक्षांची अवस्था ही मामाच्या येथे शिकायला गेलेल्या विद्यार्थ्याप्रमाने झालेली असुन मामा-मामीच पटेना आणि शिक्षन अर्धवट सोडुन जाता येईना .' अशा प्रकारचे संदेश सोशल मिडीयावर नेहमीच सर्वत्र झळकताना दिसत आहे. यामुळे घटक पक्षांचा आत्मसन्मान दुखवण्याची शक्यता असुन ते महायुतीपासुन दुर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुती मधील प्रमुखपक्षानी जागावाटपाचा तिढा लवकर सोडवुन प्रत्येक पक्षाला त्याच्या महाराष्ट्रातील ताकदीप्रमाणे जागावाटप करावा ही महाराष्ट्रातील जनसामान्यांची ईच्छा आहे. महाराष्ट्रातमध्ये मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा जिकंता आल्या मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात स्वताला राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षापेक्षा मोठा पक्ष समाजायला लागला असुन महाराष्ट्रामधील विधानसभा ही १४४ जागावरच लढणार असा सुर त्यांचे पक्षश्रेष्ठी काढत आहे आहे. परंतु राष्ट्रीय कांग्रेस हा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडीतील१२४ पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत असे राष्ट्रीय कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. त्यामुळे जागावाटपाचा गुंता हा अधिकच वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती व आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे असी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. महायुती आणि आघाडी मध्ये जागावाटपावरुन खरचं गोंधळ चालु आहे की पक्षातील बंडखोरी रोखण्याचा एक प्रयत्न आहे का? हा एक प्रश्न नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्मान होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे एकाच पक्षातील अनेक कार्यकर्ते एकाच मतदार संघामध्ये निवडणुक लढु इच्छित असतात. परंतु पक्ष हा एका मतदार संघातुन कोणत्यातरी एकाच सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देवु शकत असतो त्यामुळे बाकी निराश झालेले कार्यकर्त्ये हे बंडखोरी करण्याची अधिकाअधिक शक्यता असते. पक्षामधुन बंडखोरी झाल्यास पक्षाचेच काही कार्यकर्त्ये पक्षापासुन दुर जाउन पक्षाची स्थानिक कार्यकारणी कमजोर करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे पक्षाचा उमेदवार निवडणुक हारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुठेतरी जागावाटपामध्ये व प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार घोषित करण्यास दिरंगाई केल्यास बंडखोरी करणार्या उमेदवार्याला निवडणुकीची तयारी करण्यास खुपच कमी वेळ मिळत असल्यामुळे प्रत्येक पक्षातील बंडखोरीस आळा बसण्याची शक्यता आहे, असा समज प्रत्येक पक्षाच्या पक्षश्रेष्ठीचा झालेला दिसत आहे. म्हणुनच तर काय प्रत्येक पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे जागा वाटपाचा गुंता सोडवण्यासाठी व प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई करत तर नाही आहे ना? हा प्रश्न जनसामान्यांत चर्चेचा विषय ठरत आहे..... प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Wednesday, September 10, 2014

हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद........

हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद........ आज हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांची १०९ वी जयंती आहे. मेजर ध्यानचंद हे अत्यंत प्रतिभाशाली असलेले हॉकीचे खेळाडु होते. परंतु त्यांना लहापणापासुनच हॉकीमध्ये आवड होती अस काही नव्हते. ते भारतीय लष्करामध्ये भरती झाल्यानंतर त्यांना हॉकीमध्ये आवड निर्मान होत गेली. पुढे मेजर ध्यानचंद यांना हॉकी या खेळामुळे भारतीय लष्करात पदोन्नती मिळत गेली. त्यांना भारतसरकार कडुन १९५६साली पद्मभुषन पुरस्कार , तसेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार , अर्जुन पुरस्कार ,द्रोणाचार्य पुरस्कार या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. ध्यानचंद यांना गोलपोस्ट च्या लांबी रुंदीची संपुर्णपणे अचुक माहीती होती . मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीक ला चेंडु चिपकुनच राहायचा .. मेजर ध्यानचंद यांचा खेळ बघताना समोरील खेळाडुच्या मनात मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीक मध्ये कोणत्यातरी प्रकारचे चुंबक किंवा गोंद असण्याची शंका यायची, या शंकेतुन अनेकदा त्यांची हॉकीस्टीक तपासली जायायची. परंतु त्या तपासातुन कोणताही प्रकारचा गैरप्रकार कधीही समोर आला नाही.मेजर ध्यानचंद य़ांचा खेळ खेळण्याची शैलीच अद्भुत होती ,त्यांच्या या खेळशैलीमुळे समोरील खेळाडुला आणि प्रक्षेकांना त्यांच्या खेळाची भुरळ पडायची. अशीच भुरळ जर्मनीचा हुकुमशहा हिटलर यांना मेजर ध्यानचंद याच्या खेळाची पडली होती. हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरीकत्व आणि जर्मन लष्करात महत्वाचे पद देउ केले. परंतू ध्यानचंद यांनी हिटलर यांची ही ऑफर फेटाळत भारताकडुनच ते खेळत राहाण्याचा निर्णय घेतला आणि भारताला आलम्पीक मध्ये अनेक सुवर्णपदके मिळवुन दिली. त्यांचा वाढदिवस आपण सर्वजण 'राष्ट्रीय क्रिडादीन' म्हणुन साजरा करतो........ आपलाच संजय रा. कोकरे अमरावती मो.नं. ९५६१७३०१८९

Wednesday, September 3, 2014

"राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षनाचे राजकारण........"

"राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षनाचे राजकारण........" एखाद्या इमानदार जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण एखाद्या अत्यंत मागास असणाऱ्या समाजाला आरक्षन मिळु देणार नाही, अश्या प्रकारची वक्तव्य राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याने करणे हे कितपत योग्य आहे? हा एक जनसामान्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु असाच काही प्रकार साधुसंताच्या चरणांच्या धुळीने पवित्र झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षन आंदोलनाच्या पार्श्वभुमी वर घडत आहे. धनगर जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण धनगर जमातीला आरक्षन मिळु देणार नाही, या प्रकारची वक्तव्य महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या पदावर असणारी काही नेतेमंडळी करत आहे . एखाद्या चुकीच्या बाबीचा विरोध करायला हरकत नाही परंतु ती बाब चुकीची आहे किंवा नाही हे त्या बाबीचा अत्यंत खोल अभ्यास करुन तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. परंतु त्या बाबीचा कोणताही अभ्यास नसताना किंवा कोणत्याही प्रकारची माहीती नसताना, ती बाब बरोबर असताना सुद्धा फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्या बाबीचा विरोध करायचा हे कितपत योग्य आहे हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. असाच काही प्रकार धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत घडत आहे, धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत काही गैर संमज पसरवुन किंवा आरक्षनाला विरोध करुन महाराष्ट्रातील काही नेते मंडळी आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणाऱ्या नेते मंडळींना मी विनंती पुर्वक सांगु इच्छितो की वातानुकुलीत खोलीमध्ये बसुन आदीवासी या शब्दाची व्याख्या करण्यापेक्षा किंवा एखाद्या ईमानदार जमातीला चोर संबोधन्यापेक्षा किंवा रक्ताची गंगा वाहण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा कधीतरी धनगर समाजातील लोकांबरोबर मेंढर चारायला या मग तुम्हाला कळेल की उन्हात जीवन जगत असताना , पाण्या पावसाचा विचार न करता पोट भरण्या करता किती कष्ट करावे लागतात व म्रुत्यु च्या दाढेतच उभ राहुनच या लोंकाना आपला व्यवसाय करावा लागतो हे आपल्या लक्षात येईल. जर धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणाऱ्या नेते मंडळीनी एक दिवस जरी धनगर समाजातील लोकांबरोबर मेंढर चारत जिवण जगुन बघितले तर हीच नेते मंडळी धनगर समाज अत्यंत मागास असुन धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी ते स्वत: महाराष्ट्र राज्य शासनाला करतील मला आशा आहे. धनगर समाजाची मागणी ही अनुसुचित जमातीच्या आरक्षनाची अंमल बजावणी करण्याबाबत आहे. धनगर समाजामध्ये असलेल्या काही अभ्यासु नेत्यांच्या मते " केंद्राने प्रसारीत केलेल्या सुचीप्रमाने महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगड असा उल्लेख केलेला आहे. धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एकच आहे." ज्या प्रमाने इंग्रजीमध्ये वेरुळ असे लिहायचे असल्यास त्या शब्दाला वेरुल (Verul) असे लिहावे लागते. तसेच हिंदीमध्ये ' ळ' हा शब्द उपलब्ध नसल्यामुळे ' माळ' या मराठी शब्दाला हिंदीमध्ये 'माल' असेच लिहावे लागते. तसेच 'ओरीसा' या राज्याला 'ओडीसा' या नावाने सुद्धा संबोधल्या जाते. त्याच प्रमाने काही शाब्दीक चुकीमुळे 'धनगर' या शब्दाचे 'धनगड' असे झाले आहे. मा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाची हालाखीची स्थिती बघुन भारताच्या राज्य घटने मध्ये त्यांना अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट केले आहे. परंतु काही स्वार्थी व्रुत्तीच्या राजकारण्यांमुळे धनगर जमातीचे अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाचे हक्क त्यांच्या पासुन मागील ६० वर्षापासुन हिरावुन घेतले आहेत. धनगर जमातीवरील अन्याय दुर करण्याकरता मध्यप्रदेश राज्य शासनाने धनगर आणि धनगड एकच असल्याचा किंवा धनगर या शब्दाला धनगड असे वाचण्यात यावे असा अध्यादेश काढुन प्रसिद्ध केला. धनगर आणि धनगड एकच असल्याचा अभिप्राय१९५५ मध्ये कालेलकर समितीने आणि १९७९ मध्ये मंडल आयोग यांनी दिला आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच असल्याचे अनेक पुरावे अस्तितवात आहे भारतीय संस्कृती कोश, The wild tribes of india (पृष्ठ ७८-७९), Tribal culture of India (पृष्ठ ११२), Some Indian tribes (पृष्ठ १३१-१३२), Society in tribal India  (पृष्ठ २२), Phonology of Dhangar-kurux, Encyclopedia of the people of Asia & Oceania (पृष्ठ ६१३) अशा अनेक ग्रंथामध्ये ओरान जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर आणि धनगड असे नोंदवले आहे.१९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. त्याचप्रमाने २२ डिसेंबर १९८९ रोजी मा. माजी खासदार सुर्यकांता पाटील यांनी संसदे मध्ये महाराष्ट्रतील धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाविषयी प्रश्न विचारला असता तत्कालीन सामाजीक न्यायमंत्री रामविलास पासवान यानी धनगर आणि धनगड एकच असुन हा समाज अगोदर पासुनच अनुसुचित जमातीत समाविष्ट असल्याची बतावणी केली. धनगर समाज हा अनुसुचीत जमातीत समाविष्ट असल्याचे असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनास विरोध करणाऱ्या नेत्यांनी सर्वात प्रथम धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत असलेल्या पुराव्यांचा अभ्यास करावा व नंतरच त्यांनी धनगर आरक्षन संदर्भात वक्तव्य करावे.. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. प्रसिद्धी प्रमुख संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...