Popular Posts

Monday, October 20, 2014

"महाराष्ट्रामधील २०१४ विधानसभा निवडणुकीतील धनगरांचे योगदान"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले व सर्वत्र कमळ च कमळ फुलु लागले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना व काल परवा पर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकणार्या नेत्याला पण अनपेक्षित असणार्या अस्या पराभवाला समोरे जावे लागले. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीप्रेणित युतीचे सरकार बसण्याचे चिन्ह दिसत आहे. भारतीय जनता पार्टीला जरी स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष म्हणुन अस्तित्वात आलेला आहे. भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षाला १२३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना या पक्षाला ६३ जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षाला ४२ जागा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला महाराष्ट्रमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाची साथ घ्यावी लागु शकते.परंतु यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेत्रुत्वात सरकार स्थापण होणार नक्की. महाराष्ट्रामध्ये २००९ विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ला ४६ जागावर व शिवसेना या पक्षाला ४४ जागावर विजय मिळाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महीन्या अगोदर महायुती असताना शिवसेना व भारतीय जनता पार्टी(मित्रपक्ष) या दोन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाला पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे धनगर समाज आरक्षन क्रुती समितीने भारतीय जनता पार्टी ला समर्थन दर्शविलेले होते व मा. महादेव जानकर याचा राष्ट्रीय समाज पक्ष हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन क्रंमाकावर असणार्या धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे वळला व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात अधिक जागा जिंकण्यात यशस्वी झाल्याची दिसत आहे अशी चर्चा महाराष्ट्रातील जनसामान्यांत आहे. भाजपाच्या या यशामध्ये सर्वात मोठा वाटा हा धनगर समाजाचा मतांचा आहे असे चित्र २००९ व २०१४ विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या तुलनेवरुन दिसत आहे. धनगर आरक्षणाला शिवसेनेने महायुतीमध्ये असताना पाठींबा दर्शवला होता व महायुती तुटल्यानंतर सुद्धा शिवसेनेने धनगर आरक्षनाला कधीही विरोध दर्शवलेला नव्हता त्यामुळे धनगर समाजातील लोकांचा भाजप नंतर शिवसेनेकडे मतदानाचा कल वाढला होता. त्यामुळे शिवसेनेला २००९ च्या विधानसभा जागा पेक्षा १९ जागा २०१४ विधानसभा निवडणुकींमध्ये जास्त जिंकणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रामध्ये ५५ ते ६० मतदारसंघामध्ये धनगर समाज ज्याला मतदान करेल तो उमेदवार निवडणुन येण्याची शक्यता असते तर बर्याच मतदारसंघामध्ये जरी फक्त धनगर समाजाच्या मतदानावर जरी उमेदवार निवडुन येत नसला तरी धनगर समाजाचे मतदान सम्पुर्ण मतदानाच्या टक्केवारीमध्ये प्रभाव टाकण्या इतपत असते व त्यामुळे तेथील उमेदवार हा धनगर समाजाच्या मतादानामुळे उमेदवार विजयानजिक पोहचण्याची शक्यता असते. बारामती मध्ये मा. पंतप्रधान मोदी यांची झालेली जाहीर प्रचारसभा व त्या प्रचार सभेमध्ये धनगरांची वेशभुषा असलेल्या पिवळा फेटा व घोगंडी यांचा मा. पंतप्रधान मोदी यांनी पेहराव करुन धनगरांच्या भावणांना त्यांनी हात घातला व धनगर समाजाने पण त्यांना आपला प्रामानिक पणा दाखवत फक्त भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराला मतदान केले व भारतीय जनता पार्टीने धनगर समाजावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत भारतीय जनता पार्टी ला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी धनगर समाजाने आपल्या परिने सर्व मदत केलेली दिसत आहे. त्याच प्रमाने शिवसेनेच्या २०१४ विधानसभा निवडणुकीच्या यशामध्ये धनगर समाजाचे बरेच योगदान आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी नागपुर मध्ये विधानसभा निवडनुकीआधी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषद मध्ये एका पत्रकाराने महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांना धनगर आरक्षनाबाबत प्रश्न विचारला असता मा. राज ठाकरे यांनी धनगर आरक्षनाबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे उमेदवार निवडुण आल्यास धनगर आरक्षणाचे कधीही समर्थन करणार नाही उलट धनगर आरक्षनाला त्यांच्यापासुन धोका निर्मान होऊ शकतो हा विचार धनगर समाजातील लोकांच्या मनात निर्मान झाला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या उमेदवारास धनगर समाजाच्या लोकांनी मतदान करण्यास विरोध केला व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला मागील विधानसभा निवडणुकी एवढ्या जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत व महाराष्ट्रामध्ये कसाबसा एका जागेवर मनसेला विजय मिळवता आला. धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणार्या वसंत पुरके, हर्षवर्धन पाटील व बबनराव पाचपुते या सर्व दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाटावी लागली. यावरुन महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाची राजकीय ताकद किती आहे ह्याची जाणीव महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षाला आता झालेली दिसत आहे. व यापुढे धनगर समाजाला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये राजकारण करता येणार नाही हे महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या लक्षात आलेले आहे. धनगर समाज हा ज्याप्रमाने भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठेने राहीला त्याच प्रमाने आता भारतीय जनता पार्टीने धनगर आरक्षनाचा प्रश्न जास्त प्रलंबीत न ठेवता धनगर आरक्षनाच्या प्रश्नाला प्राधान्य देत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षन देऊन भारतीय जनता पार्टी ने धनगर समाजाला न्याय द्यावा.................. . . संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Sunday, October 12, 2014

" वास्तव: रस्त्यावर राहणार्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट"

मी अमरावती मधील दस्तुर नगर या परिसरात माझ्या मित्राला भेट देण्या करता आलो होतो. सकाळ चे दहा वाजले असताना सर्व परिसरातील लोक हे आपल्या कामावर जाण्यासाठी चौकामधुन ये जा करत होते, त्याचप्रमाने सर्वच लहान मोठी मुल-मुली आपल्या शालेय गणवेशामध्ये शाळेत जाण्याकरता चौकामधुन ये-जा करत होती. माझा मित्राला दस्तुर नगर मध्ये यायला काही वेळ लागणार होता त्यामुळे हे सर्व चित्र बघत मी दस्तुर नगर मध्ये उभा होतो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या हाताला हात लावुन मला आवाज देण्याचा प्रयत्न करत होते, मी मागे वळुन बघितले असता अत्यंत घाणरडे असे कपडे घातलेली आठ - नऊ वर्षाची मुलगी व तिच्या हातात तिचीच एक दोन वर्षाची लहान बहीण घेउन आपले हात पसरुन मला भिक मागत होती. मला त्या दोघी बहीणींची दयनीय अवस्था बघुन मला दया आली व त्यांना मी दहा रूपये दिले. त्या मुली लगेच ते पैसे घेऊन माझ्या जवळुन दुर गेल्या.अश्याच प्रकारे भिक मागणारी बर्याच प्रमाणात मुलमुली त्या नगरामध्ये फिरत होते. ती मुल-मुली कोणालाही भिक मागण्याच आपल काम करत होती. कोणी त्यांना हाकलुन लावत होते तर कोणी त्यांना दयेच्या नजरेने बघुन त्यांना काही पैसे देत होते. माझ्या मनात आता पाच मिनटा पहलचे एक चित्र आठवत होते की आपल्या सुंदर अश्या शालेय गणवेशा मध्ये मुलमुली किती आनंदाने शाळेमध्ये जात होती तर ह्या भिक मागणार्या मुलामुलींना घालयला धड कपडे नव्हते. त्या शाळेतील मुलामुलींना अत्यंत स्वादीष्ट असा जेवणाचा डब्बा त्यांच्या आई वडीलांकडुन तयार करुन मिळत होता तर एकीकडे या काही मुलांना उष्ट्या अन्नासाठी पण दारोदारी फिरावे लागत होते. हा अत्यंत भयंकर असा अनुभव मला पहायला मिळत होता. प्राथमिक शिक्षणापासुन कोणतेही मुल-मुली वंचित राहू नये म्हणुन महाराष्ट्र शासनाने अनेक योजना लागु केल्या. त्या योजनांचा या मुलांना फायदा मिळवुन देण्यामध्ये महाराष्ट्र शासन सफशेल अपयशी ठरल्याचे यावरुन दिसत आहे. मी जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लिहीलेल एक वाक्य नेहमीच वाचत असायचो ते म्हणजे " आमच्या गावात कोणताही शाळाबाह्य विद्यार्थी नाही किंवा शाळ्यबाह्य विद्यार्थी दाखवा आणि बक्षीस जिंका". जर मग सर्वच गावांच्या परिसरातील सर्वच मुल ही शाळेमध्ये शिकत असतील तर मग ही रस्त्यावर भिक मागणारी मुल आली तरी कोठुन? या मुलांच्या या बिकट अवस्थेसाठी जबाबदार आहे तरी कोण? या मुलांची अशी बिकट अवस्था असणे म्हणजे महाराष्ट्र शासनाची हार नव्हे का? जेथे सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे म्हणायला महाराष्ट्राचे नेते विसरत नसतील तर ह्या मुलांकडे लक्ष द्यायला ह्याच नेत्यांना कसा काय विसर पडतो? सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालु आहे परंतु कोणत्याही पक्षाच्या उमेदवार या मुलांच्या समस्येबाबत ठोस पाउल उचलण्याचे वचन सामान्य जनतेला का देत नाही? ह्या सर्व मुल-मुली रस्त्यावर राहत असल्यामुळे त्याच्यासोबत अपघात होण्याची, काही दुर्घटना होण्याची किंवा ती मुलमुली गुन्हेगारीक्षेत्रा कडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी राज्य शासन या मुलामुलींच्या समस्ये कडे का गंभीर रित्या बघत नाही? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात यायला सुरुवात झाली होती परंतु तेवढ्यात माझा मित्र तेथे आला आणि आम्ही दोघे माझ्या मित्राच्या घरी जायायला निघालो परंतु माझ्यामनात आलेले ते सर्व प्रश्न अनुत्तरीच राहले......... परंतु आता या प्रश्नांचे उत्तर आता तुम्हा-आम्हाला महाराष्ट्र शासनाला विचारावे लागणार आहे. अत्यंत बिकट अवस्थेत रस्त्यावर जिवण जगणार्या व म्रुत्युच्या दाढेतच उभे राहुन आपला उदारनिर्वाह करणार्या या गरीब मुला-मुलींना आता आपल्याला आपुलकीच्या भावनेने मदत करावी लागणार आहे. आता मी फक्त एवढेच सांगेन "चला उठा भारताचे भविष्य असणार्या या मुलांना मदत करुया आणि शासनाला यांच्या असणार्या बिकट अवस्थेबाबत जाब विचारुया"......... संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Wednesday, October 1, 2014

"देशाचे राष्ट्रगीत महत्वाचे की राजकीय नेत्याचे भाषण?"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकींचे पडझम सर्वत्र वाजत आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन यावा म्हणुन प्रचार सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे व प्रचार सभेचा आवाज अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावा याकरता न्युज चॅनेल त्यांचे थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही परिसरात घेतली जाणारी प्रचार सभा ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे व त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावापर्यंतच्या लोकापर्यंत पोहचत आहे. प्रत्येक पक्षाचा पक्षश्रेष्ठी आपल्या भाषणातुन आपल्या पक्षाचा लेखाजोगा मांडत असतो व भविष्यामध्ये सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यास त्याचा पक्ष कोणत्या गोष्टी करण्यावर भर देणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दि. २८ सप्टेंबर २०१४ ला संध्याकाळला मा. राज ठाकरे यांची मुंबई येथे प्रचार सभा होती. त्या सभेमध्ये मा. राज ठाकरेंचे भाषन चालु होते व बर्याच मराठी न्युज चॅनल वर त्याचे थेट प्रक्षेपण चालु होते. मा. राज ठाकरे साहेबांचे भाषन संपल परंतु तेथील व्यासपिठावर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल असे जाहीर करण्यात आले. मी राष्ट्रगीताकरता उभा राहणारच तेवढ्यात त्या न्युज चॅनेलने त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपन बंद केले आणि आपले नविन बातमीपत्र सुरु केले. माझ्या मनात विचार येत होता की राजकीय पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे अर्धा ते एक तासाचे भाषणाचे प्रक्षेपण दाखवण्यात न्युज चॅनल काही अडचण नव्हती मग ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यात न्युज चॅनेल ला काय अडचण होती. एखाद्या राजकीय पक्षाचा पक्षेश्रेष्ठीचे भाषन भारताच्या राष्ट्रगीतापेक्षा न्युज चॅनेलला मोठे वाटते की काय? हा प्रश्न माझ्याचसाठी नव्हे तर महाराष्ट्रतील जनसामान्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. जी न्युज चॅनल निवडणुक काळामध्ये राजकर्त्यांच्या भाषनाचे थेट प्रक्षेपण करु शकते, राजकीय पक्षाच्या तसेच वेगवेगळ्या सौदर्य प्रसाधनाच्या जाहीराती दाखवु शकतात तेच न्युज चॅनेल ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यास का काटकसर करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेमधील पक्षश्रेष्ठीचे संपुर्ण भाषणाचे थेट प्रक्षेपण करायचे परंतु त्याच सभेतील राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपण बंद करुन नविन बातमीपत्र सुरु करायचे हे कितपत योग्य आहे? देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाचा अभिमान असावा व आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान देशातील प्रत्येक नागरिकाने करावा असे आपणा सर्वांचे मत असते. परंतु देशाच्या राज्यघटनेचा चौथा आधारस्तंभ असलेली मिडीयाच ज्यावेळेस असे क्रुत्य करते त्यावेळेस सामान्य जनतेकडुन काय अपेक्षा करावी हा मोठा प्रश्न निर्मान होतो आहे. ईलेक्ट्रानीक्स मिडीयाला राजकीय पक्ष हा देशाच्या राष्ट्रगीतापेक्षाही मोठा वाटतो का? मिडीयाला आपल्या देशाचा अभिमान आहे की नाही? असे अनेक प्रश्न देशातील सामान्य जनतेच्या मनात निर्मान होत आहे. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...