Popular Posts

Tuesday, January 27, 2015

तुझ्याशिवाय.......


-----------------------------------------------------
बघितल नाही तुला दिवसातुन एकदातरी,
दिवस माझा सुरेख जात नाही!!
दिसताच क्षनी तु माझ्या,
मनामधील आनंदाला पारा उरत नाही!!

येते तु जेव्हा माझ्यासमोर,
मुखातुन एकही शब्द निघत नाही!!
खुप काही बोलायच असत तुझ्यासोबत,
पण तुझ्यासोबत मी काहीच बोलु शकत नाही!!

अनेकदा लपुनछपुन पाहतो मी तुला,
पण भान असत की तुला मी दिसणार नाही!!
माझे मित्र देतात तुझ्यानावाने हाक मला
तरीही तुला पाहील्याशिवाय मी राहु शकत नाही!!

कळत नकळत मी तुझ्या सुख दुखात,
सहभागी झाल्या शिवाय राहत नाही!!
झाली एखादातरी चुक तुझ्या कडुन,
मिळालेल्या शिक्षेच्यारुपात मी तुला पाहु शकत नाही!!

का? कोणास? ठाउक तुला मिळालेली शिक्षा मी,
माझ्यावर अवलंबल्याशिवाय राहत नाही!!
प्रेम म्हणजे काय हे मला माहीत नाही पण,
तुझ्याशिवाय मी या जगात जगु शकत नाही!!

म्हणुनच की काय हा कठोर ईश्वर,
मला तु भेटु देत नाही!!
आणि आली तु माझ्यासमोर तर,
माझ्यामुखातुन एकही शब्द निघु देत नाही!!

पण तरीही ईश्वराला तुझ्याशिवाय,
इतर मागण मी मागणार नाही!!
नाही मिळालीस मला तु तरीही तुझ्या सुखासाठी,
ईश्वराला प्राथना करण्याचे मी विसरणार नाही!!
-----------------------------------------------------
कवि.....
संजय रा. कोकरे
मो.नं. 9561730189
---------------------------------------------------

Sunday, January 11, 2015

नवी क्रांती घडवायची आम्हाला

हवी आमच्या हक्काची भाकर,
नकोय तुमची भिक आम्हाला !!
हवय आमच्या मेहनतीच मोल,
नकोय लाखोचे दान आम्हाला !!

हवय शेतीला चांगल बी बियाणे,
नकोय तुमची आश्वासने आम्हाला !!
हवाय पिकाला योग्य हमीभाव,
नको नावापुरत पॅकेज आम्हाला !!

भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच,
कारण जगाची काळजी आहे आम्हाला !!
करायच भारताच नाव मोठ,
नका करु डिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !!

आम्ही नाही करणार आत्महत्या,
कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !!
आमची नका करु काळजी तुम्ही,
कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !!
—————————————————
————————————————— 

@@ कवी @@
संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
—————————————————

"युवकाच्या देशात युवकांच्या समस्या....."

                              " ये देश युवाओ का है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देश म्हटल तर ते उचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ? या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणि जर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेल तर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसे काय असु शकतो..
                            " देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल" हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करण हे त्यांच परम कर्तव्यच आहे आणि युवक हे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी काय? हा एक मोठा प्रश्न जनसामान्यांकडुन विचारला जात आहे. युवकांना रोजगाराच्या, देशसेवेच्या वेगवेगळ्या संध्या उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परंतु सध्यातरी शासन यात यशस्वी होताना दिसत नाही आहे.
                            आज भारतात एक वेगळच चित्र पाहावयास मिळत आहे. युवक हे बरोजगारीच्या अंधारात ओढले जात आहे. ज्यामुळे युवकांना आपल्या कुटुंबासाठी , देश्यासाठी काहीही करता येत नाही या चिंतेतुन युवकांना अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. आणि यामुळेच की काय आजचा तरुन वाईट मार्गांनी भरकटत आहे. कोणी मध्यपान, वेगवेगळ्या प्रकारची नशा करुन मानसिक त्रास दुर करु पाहत आहे तर कोणी मटका वरली, जुगार खेळुन आपल्या कुटुंबासाठी पैसा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण या भरकटलेल्या तरुनांना कळत नाही आहे की ते हे सारे उद्योग करुन आपल व आपल्या कुटुंबाच जिवण उद्धस्त करत आहे. आणि आमच्या भारत देशाच भवितव्य अंधारात ढकलत आहे कारण आजचे युवक हा उद्याच भारताच भविष्य आहे.
                           दारु, घुटका, सिगारेट, तंबाखु हे जिवणासाठी विष आहे सर्वांनाच माहीत आहे. या सर्वांमुळे खुप सारे मोठे आजार होतात याची जाणीव सरकारलासुद्धा आहे म्हणुनच की काय सरकारने "तंबाखु सेहत के लिए हानीकारक है" ही सुचना गुटका, सिगारेट, तबाखु च्या पॅकेटवर देण्यास सुरु केली. पण या वस्तुंवर बंदी आणण सरकारला योग्य वाटल नाही किंवा ती तसदी शासनाने घेतली नाही आहे. ज्या वस्तुमुळे आपल्या समाजाच आरोग्य धोक्यात येत आहे, देशाच भवितव्य असणार्या तरुणांच आयुष्य पोखरुन निघत आहे. थोडासा आर्थिक तोटा सहन करुन देशाच्या उज्वल भविष्यासाठी अश्या वस्तुंवर बंदी आणण्यासाठी सरकारला काय हरकत हे सामान्य मानसाच्या समजण्या पलीकड आहे.
                        स्वामी विवेकानंदजी ने म्हटले आहे की "मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर मी हा पुर्ण देश बदलवुन टाकेल." आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरुन आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपिठ हव आहे. भारत या देशाला सर्वात शक्तीशाली, विकसीत, सुंदर देश बनवायच असेल तर शासनाने फक्त या ध्येयाने झपाटलेल्या युवकांना योग्य मार्गापासुन भरकटु न देता त्यांच्यासाठी एक चांगल व्यासपिठ, रोजगाराच्या संध्या, उत्कृष्ट शिक्षन या प्रकारच्या इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करुन दिल्या तर भारताला सर्वात शक्तीशाली, विकसीत होण्यापासुन कोणीही रोखु शकत नाही....
-------------------------------------------------------
संजय रा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.Facebook.com/sanjaykokare
---------——--------------------------------------

Wednesday, January 7, 2015

'मायले विचारल म्या....'

मायले विचारल म्या आपली
परिस्थिती कौन एवढी गरीब असते ?,
मायन सांगितल मले आपन शेतकर्याच्या
 एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!

 मायले विचारल म्या लोक तं
आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
मायन सांगितल मले कारण त्याईच्या
ईथची पोई आपल्या ईथच पिकते !!!

 मायले विचारल म्या त्या नेत्याच्या
 अंगावरले कपडे एवढे पांढरे कसे काय असते,
मायन सांगितल मले कारण त्यांईच्या
कपडाचा कापुस पण आपल्याच मिळते!!!

 मायले विचारल म्या मग
 माया अंगावरचे कपडे कौन मयकले असते,
मायन सांगितल मले कारण
 तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!

 मायले विचारल म्या मले 
शाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
मायन सांगितल मले कारण
 आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!

 मायले विचारल म्या आये मग
 आपल्याजवळ पैसे कौन नसते,
मायन सांगितल मले कारण आपल्या
 वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!

 मायले विचारल म्या कौन वर्गातले
पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली अस म्हणते,
मायन सांगितले मले कारण तुया
 बापान शेती करुन दुसर्याच पोट भरल असते!!!



कवी.............
संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com 

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...