Popular Posts

Sunday, January 1, 2017

*💐नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐*

माझ्या सर्व वाचक मित्रांना
*💐नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐*

संजय कोकरे

Wednesday, July 13, 2016

मानुसकीच्या माणसांचा...



मला  प्रत्येक ठिकाणी सैराट
दिसत होता,
कारण सर्वच ठिकाणी
जातीधर्माचाच मोठा वाद होता...!!

ज्याला त्याला आपल्या जातीधर्माचाच
खासदार व्हावा अस वाटत होत,
म्हणुन दुसर्या जातीधर्माचा मंत्री आपल्या
भागात मिरवावा हेही खपत नव्हत...!!

जातीविषयी कोणी काही बोलल तर
त्याला सहन होत नव्हत,
परंतु आईबापाला वृद्धाश्रमात पाठवुन
बायकोसोबत फिरण मात्र त्याला जमत होत...!!

बरेच जण जातीधर्मासाठी
काहीही करायला तयार असतात,
आणि म्हटल जा लढ देशासाठी
तर काही बोलायला तयार नसतात...!!

हे असच का होत
मला कळत नाही ,
पण हे सर्व पाहुन डोळ्यातील
अश्रु मात्र नक्कीच आवरत नाही...!!

देवाने तर साधाभोळा
माणुस तयार केला ,
मात्र पृथ्वीवर आल्या नंतर
कोणी हिंदु कोणी मुसलमान झाला...!!

मला माहीत नाही
कोण कोणता धर्म मानतो,
पण मी मात्र माणुसकी
 हाच खरा धर्म जानतो...!!

अरे सोडा तो जातधर्म जो
तोडतो माणसाला माणसापासुन,
आणि या एकत्र  सर्व
माणुसकी या धर्माची मुले बनुन...!!

मग पहा हा आपला
भारत देश कसा बनतो आदर्श जगाचा,
सर्व जगच हेवा करेल आमच्या
या देशातील माणुसकीच्या माणसांचा...!!



                                        संजय रा. कोकरे
                                                 अमरावती
                                   मो नं. 9561730189
 
twitter: www.twitter.com/kokaresanjay            
           

Tuesday, June 21, 2016

...शासन आणि शेतकरी...






          "विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला
विसरतोस . ."
         हे प्रसिद्ध नटसम्राट या मराठी चित्रपटातील संवाद आजच्या परिस्थितीशी शेतकर्यांसाठी तंतोतंत लागु पडतो अस मला वाटत. ज्या निसर्गाने शेतकर्यांना जन्म दिला त्या निसर्गाने या शेतकर्याकड पाठ फिरवली आहे आणि जी नेते मंडळी याच शेतकर्यांच्या पाठींब्यामुळे आज मंत्रालयात बसली आहे तीही या शेतकर्याची मदत करण्याऐवजी थातुरमातुर योजना लागु करुन शेतकर्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न करत आहे.
              मागील काही वर्षापासुन दुष्काळाचे संकट  या शेतकर्यांवर घोंगावत आहे. या दुष्काळामुळे शेतकर्यांना शेतीत पिक पिकतच नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या  शेतात पिकच पिकत नाही आहे त्यांनी शेतातुन उत्पन्न  घेण्यासाठी घेतलेले कर्ज भराव तरी कोठुन ? हा एक मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्मान झाला.
मागील काही वर्षापासुन दुष्काळामुळे शेतकर्याला  शेतीपासुन काहीही उत्पन्न मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकर्याला शेती साठी घेतलेले पिक कर्ज  भरता आल नाही. त्यामुळे शेतकरी हा बँकेचा थकबाकीदार राहीला. त्यामुळे बँकेनी शेतकर्यांना पुढील हंगामासाठी पिक कर्ज दिले नाही. म्हणुन शेतकर्यांनी आपल्या घरातील दागदागिने विकुन किंवा सावकाराकडुन कर्ज घेउन त्याने आपले शेत पेरले. परंतु निसर्गाने पुन्हा त्याची थट्टा केली आणि पुन्हा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे पुन्हा शेतकर्याला काहीही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज (सावकाराकडुन म्हणा की बँके कडुन म्हणा) भरता आले नाही किंवा विकलेले दागदागने ही वापस मिळवता आले नाही. त्यामुळे सावकारांचे कर्ज किंवा बँकेचे कर्ज कसे भरावे ? आणि आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह कसा करावा? असे प्रश्न शेतकर्यासमोर निर्मान झाले.
                 शासन सुद्धा संकटात सापडलेल्या या शेतकर्यांची हवी तशी मदत करण्यास पुढे येत नाही आहे. शासनाने दुष्काळामुळे पिक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे ठरवले. मात्र कोणाचे? तर त्यांचे ज्यांनी मागील वर्षी कर्ज घेतले आहे . मात्र मागील काही वर्षापासुन पडत असलेल्या दुष्काळामुळ काही शेतकरी मागील दोन ते तीन  वर्षापासुन बँकेचा थकबाकीदार झाला आहे. त्यामुळे या वर्षीच्या पिक कर्ज पुनर्गठन योजनेसाठी तो पात्र ठरत नाही. त्यामुळे शेतकर्यांसाठी ही योजना म्हणजे शासनाने त्या शेतकर्यांसोबत केलेली थट्टाच आहे असा भास होतो आहे.
                  शासनाला जर शेतकर्यांसाठी काही करायचेच होते किंवा शेतकर्यांची मदतच करायची होती तर शेतकर्यांना संपुर्ण कर्ज माफी शासनाने करायला पाहीजे होती. जेणे करुन त्यांच्या वरील बँकेचे कर्ज संपल असत आणि नव्याने बँकेतुन कर्ज घेउन शेतकर्यांनी नव्या जोमाने शेती करण्यास सुरुवात केली असती. किंवा कमीत कमी शासनाने सरसकट सर्व थकबाकीदार शेतकर्यांचे पिक कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक होते. परंतु शासनाने मात्र फक्त मागील वर्षी पिक कर्ज घेणार्याच शेतकर्यांचे पिक कर्ज पुनर्गठन करण्याच ठरवले. त्यामुळे आधीच थकबाकीदार असणार्या शेतकर्याच्या जखमावर शासनाने मीठ चोळण्याच काम केल आहे. यावरुन शासन शेतकर्याविषयी उदासिन आहे अस दिसुन येते आणि हे कृषिप्रधान असणार्या या देशासाठी नक्कीच घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही....


                                   संजय रा. कोकरे
                                        रा. पळसखेड
                            ता. चांदुर रे. जि. अम.
                      मो.नं. 9561730189
                     Email:
                     s.r.kokare1992@gmail.com

Thursday, June 16, 2016

ठेंगा...

   

                
              १५ जुनला आतेभावाचा अड्मिशन फॉर्म भरण्याकरिता अमरावतीला गेलो होतो. तस म्हटल तर मलाही जिल्हाधिकारी साहेबांना एका विषयान्वे एक निवेदन द्यायच होत. म्हणुन अमरावती जिल्हधिकारी कार्यालयाला मी गेलो आणि जिल्हाधिकारी साहेब काही कामानिमीत्त बाहेर गेले असल्यामुळ निवासी जिल्हीधिकारी साहेबांना निवेदन दिले व त्याची पोहच पावती घेतली. तेथुन आम्ही अमरावती बस डेपो जवळ गेलो. पोहच पावतीची काही झेरॉक्स काढण्याकरीता मी एका झेरॉक्स च्या दुकानामध्ये गेलो. दहा झेराक्स काढल्या. त्याला किती रुपये झाले म्हणुन विचारणा केली तर त्याने  दहा रुपये सांगितले. तेव्हा त्यांला खुप महागाई झाली अस सहजच म्हटल व त्याला १० रु. देउन तेथुन जावयास निघालो.
               तेवढ्यात त्या दुकादाराने आम्हाला परत बोलविल. आम्ही परत गेलो. त्याने त्याच्या दुकानातुन दोन एक रुपयाची नाणी काढली. आम्हाला दाखवली पण आम्हाला काहीही सुचत नव्हत हा व्यक्ती नक्की करतोय तरी काय?. त्याने आम्हाला ही दोन नाणी बघा तरी म्हणुन आग्रह केला. मग मी ती नाणी बघितली व त्याला सांगितल की ही दोन्ही एक रुपयाची नाणी आहेत. पण त्याने पुन्हा प्रश्न केला की यात तुम्हाला  दिसतय तरी काय?
                 तेव्हा मी त्यात थोड लक्ष देउन बघितल तर एका जुन्या नाण्यावर चित्र होत अन्नधान्याच तर एका नविन नाण्यावर चित्र होत हातातील बोटांपैकी असणार्या अंगठ्याच.
तेव्हा त्याने मला विचारणा केली  की  मला काय म्हणायच ते आता काही तुम्हच्या लक्षात आल का?. माझ्या पण  लक्षात आल होत की त्याला काय म्हणायच होत तर. कारण पुर्वी एक रुपयात अन्नधान्य पण मिळायच आता त्याच एका रुपयात मिळत ते जे आपण आंगठा दाखवुन लोकांना आपल्या भाषेत सांगतो तो म्हणजे " ठेंगा"....
 


                                        संजय रा. कोकरे
                                                  अमरावती
                                   मो नं. 9561730189
                email:              
                s.r.kokare1992@gmail. com

Monday, June 13, 2016

शासनाची मेंढपाळाविषयी उदासिनता





                    शासनाच्या आधुनिकतेच्या  धोरणामुळे अनेक  पारंपारिक व्यवसायांवर गदा आलेली आहे. परंतु पारंपारिक व्यवसाय करणार्या या समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचे पाउल उचलले नाही ही एक  शोकांतिका आहे. शासनाच्या आधुनिकतेचे धोरणाचे स्वागत आहेच पण या धोरणामुळे ज्या समाजाच्या वंशपारंपारिक व्यवसायावर  गदा आली त्यांचेही कुठेतरी पुनर्वसन व्हायला हवे असे माझे मत आहे. शासनाने आजवर वन्यजीव सरंक्षन कायदा, प्राणिमात्रा छळविरोधी कायदा यासारखे कायदे करण्यात आले. परंतु या कायद्यामुळे अनेक समाजाच्या पारिपारिक व्यवसायावर गदा आली व त्यांच्या उपजिवेकेचे साधन त्याच्यापासुन हिरावुन घेतल्यामुळे त्या समाजातील लोक ही दोन वेळेच्या अन्नालाही महाग झाली आहेत. परंतु शासनाने त्यांचे पुनर्वसन करण्याची तसदी घेतली नाही.
                        धनगर   समाज हा ही जंगलोजंगली भटकंती करणारा समाज. हा समाज नागरी समाज व्यवस्थेपासुन दुर राहणारा. या समाजातील अनेकाजवळ ना राहायला घर ना कसायला जमिन. यांचा उदरनिर्वाह चालतो तो फक्त शेळी मेंढीपालन व्यवसायावर. परंतु शासनाने जंगलात  शेळीमेंढींना केलेल्या बंदीमुळे हा समाज अक्षरश: उघड्यावर आला. यामुळे या समाजाच उदरनिर्वाहाचे साधन या समाजापासुन हिरावुन घेतल्या गेल. शेड बांधुन शेळीमेंढीपालन व्यवसाय करणे ही योजना बहुतेक मेंढपाळाजवळ शेतीच नसल्यामुळे फोल ठरली आहे. त्यामुळे हा समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आली. परंतु धनगर समाजाच कुठही पुनर्वसन करण्याची तसदी  मात्र शासनाने घेतली नाही. त्यामुळे धनगर समाजाचा रोष हा शासना विरुद्ध वाढतच आहे.
                    भारतात वन्यजीव सरंक्षन कायदा अस्तित्वात आल्यानंतर गारोडी समाजाने साप पकडणे, त्यांचे विष काढणे हा गुन्हा ठरु लागला. त्यामुळे गारोडी समाजाच्या वंशपारपारिक व्यवसायावर गदा आली आणि त्यांना उदर निर्वाह करणेही कठीन झाले. तेव्हा विदेशातील रोम्युलस व्हीटेकर या पर्यावरण वादी व्यक्तीने सर्पदंशाच्या लसी करीता कच्चा माल म्हणुन सापाचेच विष उपयोगात येते हे लक्षात घेउन तामिळनाडु येथाल चेन्नई येथील मद्रास सुसर याठिकाणी १९७८ साली  "ईरुला गारोडी सहकारी उद्योग संघ" स्थापन केला. तामिळनाडु सरकार ने  या सहकारी संघाला आठ हजार साप दोन जिल्ह्यातुन पकडुन विष काढण्याची परवानगी दिली. सापांना पकाडायच, दोन चार हप्ते त्यांना पाळायच,  आणि यादरम्यान त्यांत विष काढुन त्या सांपाना व्यवस्थितरित्या जंगलात सोडुन द्यायच नंतर त्या सापाच्या विषावर प्रक्रीया करुन त्या पासुन सापाच्या विषासाठी लस तयार करायची. असा हा प्रकल्प.
                 या प्रकल्पामुळे बेरोजगार झालेल्या संपुर्ण नव्हे तरीही काही गारोडी समाजाच्या युवकांच्या हाताला काम आल. गारोडी समाज आपली उपजिविका करण्याकरिता एक मार्ग काढला. परंतु या समाजाच्या हिताच्या दृष्टीने असा प्रकल्प राबविण्याच आपल्या शासनाला न सुचता ते एका विदेशी व्यक्तीला सुचाव हे नक्कच आश्चर्यजनक आहे.
                         अश्याच प्रकारे धनगर समाज हा आपली शेळी मेंढर घेउन जंगलांनी फिरत असतो. शेळी मेंढर हे काटेरी झुडुप, गवताशिवाय काहीही खात नाही. उलट शेंळी मेंढी खात असलेले गवत मोठे झाल्यानंतर वाळायला लागते ते गवत वाळल्यानंतर त्या गवतामुळे जंगलामध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. त्या वणव्यामध्ये लाखो रुपयाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते. हे गवत वाळण्यापुर्वीच शेळीमेंढी खात असल्यामुळे ते एकाप्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीच हे प्राणी संवर्धनच करत असतात. शेळीमेंढीपासुन कोणत्याही वन्य प्राण्या पासुन कोणत्याही  प्रकारचा धोका नसतो. शेळी मेंढीच्या लेंढीखतामुळे जमिन ही उत्पादन वाढवते हा आतापर्यंतच्य्या शेतकर्याचा अनुभव आहे त्यामुळे वनक्षेत्रातील जमिनीला फायदाच आहे, तरीही शासनाने  जंगलामध्ये शेळीमेंढी चराई बंदी केली ही एक आश्चर्यजनक बाब आहे.
                     रोम्युलस व्हिटेकर या मान्यवराने ज्याप्रकारे गारोडी समाजासाठी "ईरुला गारोडी सहकारी उद्योग संघ" स्थापन केला त्याच प्रमाने धनगर समाजातील बांधवावर प्रत्येकी वनक्षेत्रातील काही वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देउन शेळी मेंढी चराई पासेस देणे आवश्यक आहे जेणेकरुन धनगर समाजाचा उपजिवेकेचा प्रश्नही मिटेल व वनक्षेत्रातील वृक्षांचे संवर्धनही होईल...
                                        संजय रा. कोकरे
                                                अमरावती
                                   मो नं. 9561730189
                email:             
                s.r.kokare1992@gmail.com

Sunday, June 12, 2016

पावसाच्या सरी

कधी कधी वाटत डोळ्यात अश्रु किती लवकर येतात,
पण पावसाच्या सरी मात्र लवकर येत नाही !!
अस वाटत की या पावसाच्या सरीनांही आम्हा शेतकर्यांच्या आत्महत्या बघितल्याशिवाय राहवत नाही...!!

Saturday, September 19, 2015

शेतकरी....

आभाळालाही रडु आल आता
पाहुन  आमची ही दुर्दशा !
 आम्हाला ही विचार पडला आमच्या या
अवस्थेवर रडाव की लोकांना दाखवावा हशा !!

कित्येक जण आतापर्यंत मेले
या शेतीच्या कर्जापायी!
पिक पिकवासाठी कर्ज घेतो आम्ही पण कर्ज
भरण्यासाठी पिकच आमच्या जवळ येत नाही!!

सरकार आमच्या मयतीची प्रचार सभा करते न
करते पदयात्रा आमच्या मयतीच्या गर्दीची!
म्हणुन त्यांना अस वाटत नाही थांबाव आमच
मरण अन् बंद करावी वाट आपल्या प्रसिद्धीची!!

आमचे बिन बापाची पोर बसतात
दिवाळीच्या,दसर्याच्या दिवशीही घराच्या बाहेर उपाशी पोटी!
अन धनधागड्यांची पोर
मस्त खात राहतात तुप रोटी.!!

पण लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी
शेती करण बंद करेल!
त्या दिवशी शेतकरी नव्हे तर
अख्ख जगच उपाशी मरेल!!
अख्ख जगच उपाशी मरेल!!


संजय रा. कोकरे
अमरावती
मो.नं. 9561730189

Wednesday, September 2, 2015

शेतकर्याईचा कोणी वाली नसते..



                 गण्या  न राम्या बोलत बसले होते. दोघायच्या चेहर्यावरुन लयच गंभीर दिसुन राह्यले होते. तेवढ्यात राम्या गण्यासोबत बोलाले पुढे येते.
         राम्या: काय राज्या गण्या मले महीत पडले की कांद्याचे भाव एंशी रुपय किलोच्या वर गेले.
         गण्या: हाव ना राज्या. अन कांद्याचे भाव कमी कराईसाठी सरकारन परदेशाहुन कांदा बलावला म्हणते राज्या. कांदा लई माग झाला राज्या म्या त खान च सोडुन देल्ला कांदा..
        राम्या: पण गण्या म्या वावरात कांदा घेतला. तो म्या बाजारात आणला अन् राज्या तीन रुपय किलो च भाव आला. माये कांद्याचे पिकासाठी लागलेले पैसही नही लिगाले राज्या.
       गण्या: राम्या तसच असत बे ते जोपर्यंत आपल्या शेतकर्याच पिक आपल्या जवळ असते ना तो पर्यंत आपल्या पिकाले भावच नसते.
        राम्या: गण्या अस कौन होत रे हे?
        गण्या:  काय होते राम्या आपल्या शेतकर्याजवळ पैसे नसते. म्हणुन आपन नही काय आपल्या जवळ असलेल पिक आपण आल्या त्या  भावात विकुन टाकतो.  पण आपल्या जवळुन माल विकत घेणारे काय करते तो माल नही काय जमा करुन ठेवते. अन बाजारात क्रुतिम तुटवडा निर्मान करते.
        राम्या: त्यान काय होत बे मग?
        गण्या: बाजारात त्या मालाचा तुडवडा झाल्यान त्या मालाची मागणी वाढते पन बाजारात तो माल च नसते. मग त्याचे भाव वाढते..
         राम्या: मग?
         गण्या: एकडाव काय भाव वाढला का हे लोक आपला माल धिरेधिरे बाहेर काढते अन् आपल्या शेतकर्याच्या पिकावर कैक पटीने नफा कमवते.
          राम्या: आता माह्या लक्षात आल आपला माल विकाच्या पहीले भाव कौन कमी असते अन् माल विकल्यावर कसा भाव जास्त असते ते.
         गण्या: आला न लक्षात म्हणुनच लोक म्हणते " शेतकर्याईचा कोनी वाली नसते"


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Monday, August 24, 2015

निरागस प्रेम...




   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. असच काही प्रेमाच नात त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये होत . ते दोघही अवघ्या दहाव्या वर्गामध्ये शिकत होते. वय जेमतेम १६-१७ वर्ष.ह्या निरागस वयामध्ये कोण आपल आणि कोण दुसर हे ही सहजासहजी कळतही नसत. दोघही एकाच वर्गात शिकत असताना सुद्धा एकमेकांना ओळखत नव्हते. शाळेच्याच एका कार्यक्रमामध्ये दोघांचीही ओळख झाली. ती ओळख पुढे वाढतच गेली, पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली , अनेक विषयावर चर्चा होउ लागली. यातुनच त्यांची मैत्री ही अधिकच घट्ट होत होत गेली .एकमेकांची मोबाईल नंबर पण त्यांनी शेअर करुन घरच्यांच्या लपुनछपुन ते एकमेकांसोबत बोलु लागली ,वर्गातील मुल-मुली पण त्या दोघाच्याबाबत आपपसात चर्चा करु लागली. त्या दोघांची मैत्री ही प्रेमात रुपांतर कधी झाली हे त्या दोघांना कळलच नाही.
                  ती दोघ आता जिवणातील अविस्मरणीय क्षण जगत होती त्यांना माहीत होत व ही क्षण पुन्हा येणार नाही त्यामुळे बिंधास्त अस जिवण जगत होती. त्यांना जगाची काहीही पर्वा नव्हती , कोण आपल्याबाबत चर्चा करत आहे, कोण आपली टिंगल उडवत आहे आणि कोण आपल्या मागावर आहे याची काहीही चिंता त्या दोघांनाही नव्हती ती दोघ फक्त प्रेम करु इच्छित होती. पण हे प्रेम हे अत्यंत निरागस, निस्वार्थी प्रेम होत या या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. जणु प्रेम म्हणजे देवाकडुन मिळालेली देण अश्याच प्रकारे ती दोघही जिवण जगत होती परंतु या प्रेमाचा परिणाम त्यांच्या शिक्षनावर काय होणार , त्याच्या जिवणावर काय होणार याबाबत विचार करायला दोघही तयार नव्हती कारण दोघही एकंमेकांच्या प्रेमात आकंठ डुबायला लागली होते. परंतु समाजात निरागस अस्या प्रेमाला जागा नसते अस म्हणतात.
                    म्हणुनच काय तर या दोघांच्या प्रेमाची बातमी ही मुलीच्या घरी पोहचली. ती बातमी पोहचल्यानंतर मुलीच्या घरचे अत्यंत संतप्त झाले. तो मुलगा असलेल्या ठीकाणी ते मुलीचे कुटुंबीय आले , त्त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तो मुलगा त्यांच्या जवळ गेला व आपण कोण आहात म्हणुन विचारु लागला. त्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी मुलीच्या कुटुबियांनी त्याच्या कानाखाली एक जोरात चपराक लगावली. त्याने मी काय केल म्हणुन विचारल तेव्हा त्याला ते त्या मुलींचे कुटुबिय असल्याचे कळले. त्याची खुप घाबरगुंडी उडाली, त्याला रडु कोसळल , त्याने त्यांची माफी मागण्याचा प्रतत्न केला. पण त्याची बाजु ऐकुन घेण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीही नव्हते, सर्व जण त्याच्यावर तुटुन पडले व त्यावा लाथा बुक्क्यांनी मारु लागले. तो रडत होता , गयावया करत होता, सोडा मला सोडा म्हणुन ओरडत होता पण त्या निर्दयी लोकांना त्या गयावया करण, रडण, मला माफ करा मला सोडुन द्या यापुढे असे होणार नाही असे ओरडत होते यातील एकही शब्द ऐकु येत नव्हता.
                      काही वेळानंतर त्याची मार खाण्याची क्षमता संपली व तो बेशुद्ध होउन त्या रस्त्यावर पडला. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रस्त्यावर तसेच सोडुन मुलीचे ते कुटुंबीय आपल्या घरी निघुन गेले. तो १६-१७ वर्षाचा निरागस मुलगा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता पण त्याला उचलायला कोणही समोर आल नाही. काही वेळाने त्या मुलांच्या कुटुंबियांना माहीती पडल व त्यांनी त्या मुलाला उचलुन दवाखाण्यात नेल. मुलांच्या कुटुंबिय पण त्या मुलींच्या कुटुबियाना मारायला निघाले पण त्या मुलाच्या वडीलांनी त्यांना थांबवल. व झाल ते झाल पण आता हे प्रकरण आपल्याला वाढवायच नाही आहे कारण हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचल्यास माझ्या मुलाच जिवण हे उद्वस्त होउ शकत म्हणुन आपल्या शांत राहायच आहे. पण मुलींच्या कुटुबियांनी हा विषय इथेच बंद न करता त्या मुलीचे शिक्षन सोडवले व त्या मुलीवर अनेक निर्बंघ लादल्या गेले. व त्यानंतर कधीही त्या मुलाची व मुलीची भेट झाली नाही.........
                    या निरागस, निस्वार्थी प्रेमाचा असा शेवट का झाला की त्या मुलाला दवाखान्यात अति दक्षता कक्षा मध्ये रहाव लागल, मुलीला आपल्या हक्काच्या शिक्षनापासुन मुकाव लागल. आजचे पालक एवढे निर्दयी आहेत का ? की ते एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलाला एवढ बेदम मारहान करु शकतात , आपल्या स्वताच्या मुलीला शिक्षण सोडण्यास कारणीभुत ठरु शकतात , आपल्या मुलीवर अनेक निर्बंध घालु शकतात....
खर तर हा प्रश्न दोघांनाही समजुत देउन, शिक्षकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लावुन, किंवा दोन्ही कुटुंबियांनी आपपल्या मुलांना समज देउन, प्रेमळ अशी दमदाटी करुन सोडविता आला पण हा प्रश्न सोडवण्या करीता जो काही मार्ग अवलंबविला गेला तो दोन निरागस मुलांच्या जिवणाचा अस्त ठरला. आपला समाज हा अत्याधुनिक जगाबरोबर जगतो आहे की तो आजही सोळाव्या सतराव्या शतकात जगत आहे हा मोठा प्रश्न आहे.......



संजय राजु कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com


Sunday, August 23, 2015

आपले लिखान पाठवा...

कृपया तज्ञ, लेखक, अभ्यासु व्यक्तींनी आपले लेख असल्यास आम्हाला नक्की पाठवा. प्रसिद्दी योग्य मजकुराला आम्ही तुमच्या नावासहीत आमच्या ब्लाग वर प्रसिद्ध करु...

साहीत्य पाठविण्याकरिता आपण संपर्क फार्म चा उपयोग कर शकता किंवा Email: S.r.kokare1992@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवु शकता...

Saturday, August 22, 2015

नेत्याईसाठी बी CET चालु कराले पाहीजे....


   गण्या रस्त्यान चालला होता तेवढ्यात त्याले राम्या येताना दिसते,
   गण्या: कुठ चाल्ला बे!
   राम्या: कुठ नइ मयी CET ची परिक्षा आहे न त्याचेच पुस्तक आणाले चाल्लो.
   गण्या: अबे राम्या हे CET म्हणजे काय होते रे!
   राम्या: काय राजा गण्या तुले CET  म्हणजे काय महीत नही काय, अबे माय d.ed. झाल न् झाल नोकर्याच संपल्या राज्या मग सरकारन पात्रता परिक्षा ठेवली हुशार तपासुन नोकरी लावासाठी त्याच परिक्षाले राज्या CET म्हणते.
   गण्या: हुशार पोरं तपासुन लावा साठी हे पात्रता परिक्षा होय मग? काय रे मग तु कायले चाल्ला मग तिथ?
   राम्या: तुले मघाशीच त् सांगतल ना बे CET ची परिक्षा द्यायाची हाय म्हणुन त्याइचे पुस्तक आणाले चाल्लो म्हणुन
   गण्या: नइ ते बरोबर हाय तुय, पण हे CET परिक्षा त् हुशार पोर तपासुन लावते ना मग तु कायले चाल्ला बे ते परिक्षा द्याअले.
   राम्या: काय राज्या मले डायरेक्ट बह्याड म्हणुन राह्यला तु!
   गण्या: मजाक करुन राह्यलो ना बे तुई. आता तुई मजाक नई कराव त कोणाची कराव राज्या.
  राम्या: थे बी बरोबर हाय म्हणा, आपलेले अशेच मजाक करत दिवस काढा लागते.
  गण्या: काय बे राम्या ह्या आमदारायसाठी, खासदारायसाठी कोण नई बे CET ठेवत हे सरकार
  राम्या: त्यान काय हुयीन बे,
  गण्या: ह्या नेत्याइतल्या बह्याडाईले बाहेर काढुन हुशारायीले शोधुन आमदार, खासदार तरी करता येइन बे
   राम्या: बरोबर हाय तुय! पण नेमक त्यान काय हुयीन.
   गण्या: जस बह्याड पोराईतले हुशार पोर ले पारखुन चांगला मास्तर तयार करते हे सरकार, तसच मग ह्या नेताईतले बह्याड नेत्याइले बाहेर काढुन हुशार नेत्याले आमदारकी, खासदारकी उभ करता ईन मग आपला देश बी लई पुढ जईन राज्या.
   राम्या: खर बोलला राज्या तु गण्या....


संजय  कोकरे
9561730189
Www.sanjaykokre.blogspot.com

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...