Popular Posts

Saturday, September 19, 2015

शेतकरी....

आभाळालाही रडु आल आता
पाहुन  आमची ही दुर्दशा !
 आम्हाला ही विचार पडला आमच्या या
अवस्थेवर रडाव की लोकांना दाखवावा हशा !!

कित्येक जण आतापर्यंत मेले
या शेतीच्या कर्जापायी!
पिक पिकवासाठी कर्ज घेतो आम्ही पण कर्ज
भरण्यासाठी पिकच आमच्या जवळ येत नाही!!

सरकार आमच्या मयतीची प्रचार सभा करते न
करते पदयात्रा आमच्या मयतीच्या गर्दीची!
म्हणुन त्यांना अस वाटत नाही थांबाव आमच
मरण अन् बंद करावी वाट आपल्या प्रसिद्धीची!!

आमचे बिन बापाची पोर बसतात
दिवाळीच्या,दसर्याच्या दिवशीही घराच्या बाहेर उपाशी पोटी!
अन धनधागड्यांची पोर
मस्त खात राहतात तुप रोटी.!!

पण लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी
शेती करण बंद करेल!
त्या दिवशी शेतकरी नव्हे तर
अख्ख जगच उपाशी मरेल!!
अख्ख जगच उपाशी मरेल!!


संजय रा. कोकरे
अमरावती
मो.नं. 9561730189

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...