लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.
Popular Posts
-
🌹 *गुरू - शिष्य* 🌹 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜 गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञ...
-
*👉चुक कुठे झाली ...* _लेखक- अनामिक._ एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणीक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सा...
-
*🙏विचार धन🙏* एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्या...
Thursday, March 19, 2020
Wednesday, August 28, 2019
गुरु व शिष्य...
🌹 *गुरू - शिष्य* 🌹
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञा दिली.
शिष्य झाडावर सरसर चढत वर गेला. शेंड्याकडे पोहोचेपर्यंत
त्याच्या लक्षात आलं की गुरूचं आपल्याकडे लक्षच नाही. तो
इतर शिष्यांशी हास्यविनोद करतो आहे. शेंड्यावर पोहोचून
त्याने गुरूकडे पसंतीच्या पावतीच्या अपेक्षेने पाहिलं तर
वनभोजन करून गुरू चक्क डाराडूर झोपी गेला होता.
शिष्य आपल्या संप्रदायाची ध्वजा शेंड्याला बांधून काळजीपूर्वक
खाली उतरू लागला. त्याचं मन कटुतेने भरून गेलं होतं. तो
जमिनीपासून वीसेक फुटांवर पोहोचला, तेव्हा खालून आवाज
आला, सांभाळून. उजवीकडची फांदी कुजकी आहे, तिच्यावर
वजन नको टाकूस.
खालून गुरू सूचना देत होता. शिष्य जमिनीवर पोहोचेपर्यंत
त्याच्या सूचनांची सरबत्ती सुरू होती. तिने शिष्याचं मन
आणखी विषादाने भरून गेलं.
खाली उतरल्यावर गुरूला वंदन करून तो त्याची नजर चुकवून
बाजूला उभा राहिला. गुरूने प्रेमाने विचारलं, काय झालं? तू
नाराज दिसतोयस...
शिष्य म्हणाला, मी सगळ्यात धोकादायक जागी होतो, झाडाच्या शेंड्यावर होतो, जिथून पडलो असतो तर जीव गेला असता, अशा जागी होतो, तेव्हा तुम्ही गाढ झोपला होतात. जमिनीपासुन वीस फुटांवर आल्यावर मात्र काळजीपूर्वक सूचना द्यायला लागलात.
काय अर्थ समजायचा याचा मी?
गुरू हसून म्हणाला, तू झाडाच्या शेंड्यावर होतास, तेव्हा तुझ्या
मनात कोणते विचार होते?
शिष्य म्हणाला, विचार? कसले विचार असणार? तिथे फक्त
जीव वाचवून खाली उतरण्यावरच लक्ष केंद्रित होतं...
गुरू म्हणाला, म्हणूनच मी झोपलो होतो, कारण तू जागा
असणार, याची मला खात्री होती. जमिनीपासून २० फुटांवर
पोहोचल्यावर मात्र तुला वाटायला लागलं की आता आपण
पोहोचलो, जिंकलो. ही मेंदूला गुंगी येण्याची वेळ असते.
शेंड्यावरून पडून कोणी मेल्याचं ऐकलंयस का कधी?
माणसं दहावीस फुटांवरूनच पडून मरतात. तू जिथे
झोपशील अशी शंका निर्माण झाली, तिथे मी जागा
राहिलो. तेच माझं काम आहे.
🙏🏻 *जय गुरुदेव* 🙏🏻
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञा दिली.
शिष्य झाडावर सरसर चढत वर गेला. शेंड्याकडे पोहोचेपर्यंत
त्याच्या लक्षात आलं की गुरूचं आपल्याकडे लक्षच नाही. तो
इतर शिष्यांशी हास्यविनोद करतो आहे. शेंड्यावर पोहोचून
त्याने गुरूकडे पसंतीच्या पावतीच्या अपेक्षेने पाहिलं तर
वनभोजन करून गुरू चक्क डाराडूर झोपी गेला होता.
शिष्य आपल्या संप्रदायाची ध्वजा शेंड्याला बांधून काळजीपूर्वक
खाली उतरू लागला. त्याचं मन कटुतेने भरून गेलं होतं. तो
जमिनीपासून वीसेक फुटांवर पोहोचला, तेव्हा खालून आवाज
आला, सांभाळून. उजवीकडची फांदी कुजकी आहे, तिच्यावर
वजन नको टाकूस.
खालून गुरू सूचना देत होता. शिष्य जमिनीवर पोहोचेपर्यंत
त्याच्या सूचनांची सरबत्ती सुरू होती. तिने शिष्याचं मन
आणखी विषादाने भरून गेलं.
खाली उतरल्यावर गुरूला वंदन करून तो त्याची नजर चुकवून
बाजूला उभा राहिला. गुरूने प्रेमाने विचारलं, काय झालं? तू
नाराज दिसतोयस...
शिष्य म्हणाला, मी सगळ्यात धोकादायक जागी होतो, झाडाच्या शेंड्यावर होतो, जिथून पडलो असतो तर जीव गेला असता, अशा जागी होतो, तेव्हा तुम्ही गाढ झोपला होतात. जमिनीपासुन वीस फुटांवर आल्यावर मात्र काळजीपूर्वक सूचना द्यायला लागलात.
काय अर्थ समजायचा याचा मी?
गुरू हसून म्हणाला, तू झाडाच्या शेंड्यावर होतास, तेव्हा तुझ्या
मनात कोणते विचार होते?
शिष्य म्हणाला, विचार? कसले विचार असणार? तिथे फक्त
जीव वाचवून खाली उतरण्यावरच लक्ष केंद्रित होतं...
गुरू म्हणाला, म्हणूनच मी झोपलो होतो, कारण तू जागा
असणार, याची मला खात्री होती. जमिनीपासून २० फुटांवर
पोहोचल्यावर मात्र तुला वाटायला लागलं की आता आपण
पोहोचलो, जिंकलो. ही मेंदूला गुंगी येण्याची वेळ असते.
शेंड्यावरून पडून कोणी मेल्याचं ऐकलंयस का कधी?
माणसं दहावीस फुटांवरूनच पडून मरतात. तू जिथे
झोपशील अशी शंका निर्माण झाली, तिथे मी जागा
राहिलो. तेच माझं काम आहे.
🙏🏻 *जय गुरुदेव* 🙏🏻
Thursday, August 22, 2019
आई तेथे खूप भयानक जंगल आहे (there is a jungle out there)
*👉चुक कुठे झाली ...*
_लेखक- अनामिक._
एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणीक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये हमेशा 100% मार्क मिळवले.
अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय आय टी चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी टेक ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिवर्सिटी ऑफ़ केलिफ़ोर्निया मधून तो एम बी ए झाला.
आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही हमेशा टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.
त्याचे पाच बेडरूम चे घर होते. चेन्नई च्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....
पण दुर्भाग्याने आज पासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली.
काय चूक झाली होती. शेवटी असं काय घडलं, गड़बड़ कुठे झाली.
हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले आणि या परिस्थीतीत हाच सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.
त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने ‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला.
सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.
अमेरिकेच्या आर्थिक मंदी मुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही जेव्हा नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.
काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नी ने आत्महत्या केली...
तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की : या माणसाची मानसिकता यश मिळवणे यासाठीच तयार झालेला होती परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते.
आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या.
अभ्यासात खूप हुशार होता, हमेशा पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो, ज्यांची हीच इच्छा असते की त्यांचा मुलगा हमेशा पहिलाच यावा, त्याच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्याने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
मग अशी मुलं काही जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात.
बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेज चे ओझे लादले बिचाऱ्यावर, तेथून निघाला तर एम बी ए, आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे टार्गेटस् .
हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीट शी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.
हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडे वाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.
एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती. एक मेंढी चे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एका कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." *There is a Jungle out there.*
अशा या खतरनाक जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.
विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देने ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थिति ला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता आणि त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.
शेवटी मुलं आपली आहेत, प्रमाणापेक्षा प्रक्रिया आहेत.
_*लेखक- अनामिक.*_
(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखकास सादर समर्पित. मुळ *'हिंदी'* भाषेतील लेखाचा मी केलेला स्वैर मराठी अनुवाद.. -मेघःशाम ).
*प्रियांका चव्हाण, मुंबई* यांच्या संग्रहातील हिंदी कथा.
_लेखक- अनामिक._
एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणीक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये हमेशा 100% मार्क मिळवले.
अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय आय टी चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी टेक ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिवर्सिटी ऑफ़ केलिफ़ोर्निया मधून तो एम बी ए झाला.
आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही हमेशा टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.
त्याचे पाच बेडरूम चे घर होते. चेन्नई च्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....
पण दुर्भाग्याने आज पासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली.
काय चूक झाली होती. शेवटी असं काय घडलं, गड़बड़ कुठे झाली.
हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले आणि या परिस्थीतीत हाच सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.
त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने ‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला.
सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.
अमेरिकेच्या आर्थिक मंदी मुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही जेव्हा नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.
काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नी ने आत्महत्या केली...
तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की : या माणसाची मानसिकता यश मिळवणे यासाठीच तयार झालेला होती परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते.
आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या.
अभ्यासात खूप हुशार होता, हमेशा पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो, ज्यांची हीच इच्छा असते की त्यांचा मुलगा हमेशा पहिलाच यावा, त्याच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्याने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
मग अशी मुलं काही जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात.
बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेज चे ओझे लादले बिचाऱ्यावर, तेथून निघाला तर एम बी ए, आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे टार्गेटस् .
हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीट शी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.
हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडे वाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.
एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती. एक मेंढी चे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एका कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." *There is a Jungle out there.*
अशा या खतरनाक जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.
विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देने ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थिति ला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता आणि त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.
शेवटी मुलं आपली आहेत, प्रमाणापेक्षा प्रक्रिया आहेत.
_*लेखक- अनामिक.*_
(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखकास सादर समर्पित. मुळ *'हिंदी'* भाषेतील लेखाचा मी केलेला स्वैर मराठी अनुवाद.. -मेघःशाम ).
*प्रियांका चव्हाण, मुंबई* यांच्या संग्रहातील हिंदी कथा.
Tuesday, March 5, 2019
अटल पेन्शन योजना...
*अटल पेन्शन योजना*_
---------------------------------------------------------------------------------
_अटल पेन्शन योजना ही योजना निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे._
🧐 _*कोण सहभागी होऊ शकतं?*_ : _18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात._
🤔 _*किती रक्कम भरायची?*_ : _18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळणार आहे. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळणार आहे. तसेच दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोयही यात आहे._
👍 _*सरकारचेही योगदान*_ : _या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे._
🎯 _*अट काय?*_ : _ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे._
🤨 _*मृत्यू झाल्यास काय?*_ : _ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे._
Monday, August 20, 2018
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
*2 लाखांचे अपघात विमा शेतकरी बांधवांसाठी विना मूल्य/मोफत महाराष्ट्र शासन तर्फे।*
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 20171-8*
*ह्याचे फॉर्म कुठे भेटेल-*
तुमच्या गावाच्या कृषी अधिकाऱ्याकडे।
*ही योजना पूर्ण पने मोफत आहे व ह्या विमा योजनेचे रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास तुम्हि कोर्टात केस टाकू शकता व त्याचा खर्च सरकार देईल।*
बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे. मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.
माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत शेतकरी अपघाती मृत्यू व अपंगत्व अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.
*नुकसान भरपाई रक्कम.*
1) शेतात काम करतांना/ अपघातात मृत्यू - २ लाख.
2) 2 अवयव निकामी होणे- 2 लाख
3) 1 डोळे निकामी होणे- 1 लाख.
4) 2 डोळे निकामी होणे - 2 लाख ..etc
*अपघाताचे प्रकार*
-रेल्वे/ रस्ता अपघात.
-पाण्यात बुडून मृत्यू.
-जंतू नाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा.
-विजेचा धक्का अपघात.
-वीज पडून मृत्यू.
खून.
-उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू.
-सर्प दंश/ विंचू दंश.
-नक्षल वाद्या कडून हत्या.
-जनावरांमुळे हल्याने मृत्यू.
-दंगल.
-अन्य कोणतेही अपघात.
*अनुषंगिक कागत पत्रे*
1) मृत्यू दाखला
2) शव चिकित्सा दाखला
3) स्तळ पंचनामा
4) पोलीस पाटील दाखला
5) FIR कॉपी
6) इंवेस्ट पंचनामा
7) अपंगत्व सर्टिफिकेट
*लागणारे कागत पत्रे*
१) 7/१२ किंव्हा ८'अ' किंव्हा 6 'ड' फेरफार
2) शेतकऱ्यांचे वय 10 ते 75
3) शेतकरी स्वतः वाहन चालवत असेल आणि अपघात झाला तर वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.
🙏🙏कृषि सहाय्यक 🙏🙏
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 20171-8*
*ह्याचे फॉर्म कुठे भेटेल-*
तुमच्या गावाच्या कृषी अधिकाऱ्याकडे।
*ही योजना पूर्ण पने मोफत आहे व ह्या विमा योजनेचे रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास तुम्हि कोर्टात केस टाकू शकता व त्याचा खर्च सरकार देईल।*
बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे. मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.
माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत शेतकरी अपघाती मृत्यू व अपंगत्व अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.
*नुकसान भरपाई रक्कम.*
1) शेतात काम करतांना/ अपघातात मृत्यू - २ लाख.
2) 2 अवयव निकामी होणे- 2 लाख
3) 1 डोळे निकामी होणे- 1 लाख.
4) 2 डोळे निकामी होणे - 2 लाख ..etc
*अपघाताचे प्रकार*
-रेल्वे/ रस्ता अपघात.
-पाण्यात बुडून मृत्यू.
-जंतू नाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा.
-विजेचा धक्का अपघात.
-वीज पडून मृत्यू.
खून.
-उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू.
-सर्प दंश/ विंचू दंश.
-नक्षल वाद्या कडून हत्या.
-जनावरांमुळे हल्याने मृत्यू.
-दंगल.
-अन्य कोणतेही अपघात.
*अनुषंगिक कागत पत्रे*
1) मृत्यू दाखला
2) शव चिकित्सा दाखला
3) स्तळ पंचनामा
4) पोलीस पाटील दाखला
5) FIR कॉपी
6) इंवेस्ट पंचनामा
7) अपंगत्व सर्टिफिकेट
*लागणारे कागत पत्रे*
१) 7/१२ किंव्हा ८'अ' किंव्हा 6 'ड' फेरफार
2) शेतकऱ्यांचे वय 10 ते 75
3) शेतकरी स्वतः वाहन चालवत असेल आणि अपघात झाला तर वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.
🙏🙏कृषि सहाय्यक 🙏🙏
Friday, August 17, 2018
जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.
*🙏विचार धन🙏*
एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.
कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.
होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.
सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.
त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."
प्रवाशी हसून म्हणाला "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.
*तात्पर्य*
*जो पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....*
*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय पर्याय नाही हे जाणून शरण येतो ..
एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.
कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.
होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.
सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.
त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."
प्रवाशी हसून म्हणाला "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.
*तात्पर्य*
*जो पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....*
*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय पर्याय नाही हे जाणून शरण येतो ..
Wednesday, August 15, 2018
Saturday, August 11, 2018
Thursday, August 2, 2018
बोण्ड अळी यादी 2018 (Bond Ali List 2018)
महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी झालं तर काही शेतकऱ्यांना आपल्या पिकावरून नांगर फिरावं लागला होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ६८०० रु. मदत जाहीर केली होती.
त्यामुळे ज्या शेतकऱ्याला बोण्ड अळी चे अनुदान देय झाले आहेत. त्या शेतकऱ्याचेही यादी शासनाने जाहीर केली आहे. तरी सर्व बोण्ड अळी मुले आपले पीक बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आपले नाव या शोधायचे असल्यास पुढील स्टेप फॉलो कराव्यात...
१. सर्वात प्रथम www.google.com या वेबसाईट वर जावे
२.नंतर bond ali 2018 list "Your sub district or district name" हे search करावे
३. "Your sub district or district name" या शब्दाच्या जागी आपल्या तालुक्याचे किंवा जिल्हाचे नाव टाकावे जेणेकरून तुमच्या स्वतःच्या तालुक्यातील किंवा जिल्हातील बोण्ड अळी अनुदान लिस्ट तुम्हाला दिसेल.
३. त्यानंतर ते सर्च करावे
४. त्यानंतर तुम्हाला google सर्च मध्ये १ नंबरच्या option मध्ये bold ali 2018 ______ हे दिसेल.
५. _________ च्या जागी तुम्हाला तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव दिसेल.
६. त्यानंतर त्यावर तुम्ही क्लिक करा.
७. आणि नंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याची बोण्ड अळी अनुदान लिस्ट ची PDF ची फाईल मिळेल. व तुम्ही ती डाउनलोड करावी
७. आणि त्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचे किंवा तुमच्या गावाचे नाव शोधावे.......

त्यामुळे ज्या शेतकऱ्याला बोण्ड अळी चे अनुदान देय झाले आहेत. त्या शेतकऱ्याचेही यादी शासनाने जाहीर केली आहे. तरी सर्व बोण्ड अळी मुले आपले पीक बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आपले नाव या शोधायचे असल्यास पुढील स्टेप फॉलो कराव्यात...
१. सर्वात प्रथम www.google.com या वेबसाईट वर जावे
२.नंतर bond ali 2018 list "Your sub district or district name" हे search करावे
३. "Your sub district or district name" या शब्दाच्या जागी आपल्या तालुक्याचे किंवा जिल्हाचे नाव टाकावे जेणेकरून तुमच्या स्वतःच्या तालुक्यातील किंवा जिल्हातील बोण्ड अळी अनुदान लिस्ट तुम्हाला दिसेल.
३. त्यानंतर ते सर्च करावे
४. त्यानंतर तुम्हाला google सर्च मध्ये १ नंबरच्या option मध्ये bold ali 2018 ______ हे दिसेल.
५. _________ च्या जागी तुम्हाला तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव दिसेल.
६. त्यानंतर त्यावर तुम्ही क्लिक करा.
७. आणि नंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याची बोण्ड अळी अनुदान लिस्ट ची PDF ची फाईल मिळेल. व तुम्ही ती डाउनलोड करावी
७. आणि त्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचे किंवा तुमच्या गावाचे नाव शोधावे.......

Monday, July 30, 2018
देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका. पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.
एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान (अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंद यांना सहज
हसत हसत म्हणटले की,
स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
तेहतीस कोटी काa,aय या जगात एकही देव अस्तित्वात नाही.
सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?
आणि तो व्यक्ती खदखदा हसू लागला.
हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
" तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हणटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.
"काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो.
त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते.
हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.
परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे.
कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा.
देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका.
पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा
जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंद यांना सहज
हसत हसत म्हणटले की,
स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
तेहतीस कोटी काa,aय या जगात एकही देव अस्तित्वात नाही.
सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?
आणि तो व्यक्ती खदखदा हसू लागला.
हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
" तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हणटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.
"काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो.
त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते.
हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.
परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे.
कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा.
देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका.
पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा
Wednesday, July 25, 2018
मागील पिढी आणि आजची पिढी
नमस्कार, मी प्रजोत कुलकर्णी आज मी मागील पिढी आणि सध्याची पिढी यावर लेख लिहित आहे, बरेच दिवस हा लेख लिहायचा विचार होता पण वेळेअभावी जमले नाही असो पण लेख लिहायचे कारण म्हणजे सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. माझ्या २६ वर्षाच्या आयुष्यात बरेच बदल मला जाणवले. मी माझ्या आयुष्यावरून हा लेख लिहित आहे. पण ही तफावत जी आहे ती सर्वांच्याच बाबतीत दिसून येईल तसेच सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. मी लहानपणापासून सुरवात करत कसे बदल घडत गेले ते मांडायचा प्रयत्न करतो आणि मग सगळ्यात शेवटी एक सारांश लिहितो.मी लहान असताना सकाळ संध्याकाळ घरात माझ्याकडून श्लोक, स्तोत्रे म्हणून घेतली जात होती. उदा. सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोर सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे. मुले गाणी म्हण किंवा नाच कर असे म्हणाल्यावर मुन्नी आणि शीला यासारख्या गाण्याशिवाय त्यांना काही आठवतच नाही, आणि आपण किती सुंदर नाच केला किंवा गाणे झाले म्हणून टाळ्या वाजवतो.थोडे मोठे झाल्यावर अंगणात किंवा मैदानात जे खेळ खेळायचो त्यातील काही खेळ जे परदेशातून भारतात आले ते आताची मुले कॉम्पुटर, लॅपटॉप, आयपॅड वर खेळतात. लपंडाव, सूरपारंब्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, गोट्या, विष अमृत हे खेळ तसेच मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळ उदा. सापशिडी, ल्युडो, काचा कवड्या आणि बरेच बारीकसारीक खेळ हे आजच्या मुलांना माहित देखील नाहीत. तसेच या प्रकारच्या खेळातून व्यायामही चांगला होत असे आणि बुध्दी हि तल्लख होत होती. त्या काळी व्यायाम हा प्रकार वेगळाच होता जोर, उठाबाश्या, दोरीउड्या, सूर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम आम्ही करत होतो आता व्यायाम म्हंटले कि डम्बेल्स घ्यायचे, मशीन वर धावायचे, वजन उचलायचे म्हणजे झाले.
त्यावेळी आहार हा हि खूप पौष्टिक असत होते, आजकाल ची मुले फक्त जाहिरात बघून नुडल्स खा कुठे पास्ता खा, अजून बाकीचे फास्टफूड खा असे करतात, त्यावेळी नाश्ता केला तरी तो शरीराला चांगला असा असे उदा. पोहे, शिरा, उपमा आणि हे शक्यतो रोज नसायचे रोज सकाळी सकाळी गरमागरम भाकरी त्यावर मस्त तूप मीठ लावून खायचो. तसेच रोजचा आहार पण सकस असत होता. डावा उजवा सगळा रोजच्या रोज पानात असत असे उदा. चटण्या, कोशिंबीर, लोणचे इ. त्यामुळे शरीराला लागणारी जीवनसत्व व्यवस्थितरीत्या मिळत होती याचा परिणाम म्हणजे शरीराचीही वाढ खूप चांगली होत असे.
त्यावेळेची शिक्षणपध्दती पण वेगळी होती, रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. त्यावेळेचे शिक्षकही खूप काटेकोर होते, मला शिक्षकाने मारले ती तक्रार घेवून जर घरी गेलो तर घरात दोन रट्टे मिळायचे, मग का मारले हे विचारले जायचे. आजकाल मुलेच शिक्षकांना मारतात वर त्याचे पालक त्यांना काहीच बोलत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण टाकला जातो, त्यात पालकांचा दोष नाही आहे हि यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करत आहे. जर या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकायचे असेल तर हे सर्व करावे लागते, मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या वजनापेक्षा जास्त आहे. पण हे सर्व करताना त्यांचे बालपण कुठेतरी हरवले जात आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही. पालकांना आपण घेतलेले कष्ट फक्त दिसतात पण जे बालपण आपण जगलो (कठीण प्रसंग नाही तर खेळणे बागडणे इ.) ते आजकाल च्या मुलांना जगायला मिळत कि नाही हे कोण पाहत नाही. आज शाळा सुरु झाली कि सकाळी क्लास नंतर शाळा, मग पुन्हा संध्याकाळी क्लास, ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा सुट्टीचे क्लास वेगळे, काय चाललाय हे ?. बरं शाळेला सुट्टी पडेल तेव्हा ते क्लास वेगळे, वेगळी वेगळी शिबिरे यात मुलांना बालपण काय असते हेच कळत नाही, त्यांना बालपण म्हणजे एक शिक्षा वाटू लागली आहे. एवढे करून जेवढे व्यवहार ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे ते मिळताच नाही आहे उदा. माझ्या आधीची पिढी अजूनही आकडेमोड करताना तोंडी करते आणि मी कागद पेन किंवा कॅल्क्युलेटर चा वापर करतो, पण हे हि तेवढेच खरे कि मी जितकी आकडेमोड तोंडी करू शकतो तेवढी आज काल ची मुले करू शकतील कि नाही ती शंका आहे. मला पहिला मोबाईल मी एम. एस.सी ला असताना घरच्यांनी दिला होता, आणि गाडी मी नोकरीला लागल्यावर घेतली पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येतात.
लिहायचे झाले तर बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण जे मला ४ मुद्दे (वरील ४ भागात मांडलेले) महत्वाचे वाटतात त्यावर मी सारांश लिहित आहे.
- संस्कार : मुलांना चांगल्या संस्काराची गरज खूप आहे, जर का लहानपणीच चांगले संस्कार मुलांवर झाले तर ते त्यांना भविष्यात हि उपयोगी पडतात. ८-१५ दिवस वर्षातून किंवा सहा महिन्यातून मुलांना संस्कार शिबिरात पाठवले म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, ते रोजच्या जीवनात आचरणात आणावे लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार होत आहेत कि नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे जरुरीचे आहे.
- खेळ/व्यायाम : खेळ आणि व्यायाम यामुळे आपले शरीर घडते ते जर का योग्य नियोजन करून मुलांना त्याचे फायदे सांगितले तर ते त्यांच्यासाठी उत्तम होते. प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. तसेच जो व्यायाम केला जातो तो जन्मभर त्यांना उपयोगी पडेल याचा विचार केला गेला पाहिजे. यामुळे आपले जे पारंपारिक खेळ आहेत हेही जतन केले जातील आणि याचा उपयोग मुलांच्या आयुष्यात नक्की होईल.
- आहार : जो आहार मुलांना (आपल्यालाही) मिळाला पाहिजे तो आजकाल मिळत नाही आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. जर का सकस आणि चौरस आहार आपल्याला मिळाला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
Tuesday, July 24, 2018
एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी क्लास लावावाच का?
नमस्कार मित्रानो, मी प्रकाश पोळ. राज्यसेवा 2016 परीक्षेतून गटविकास अधिकारी या पदासाठी माझी निवड झाली आहे. रिजल्ट लागल्यापासून मी अनेक विद्यार्थी मित्रांशी बोललो आहे. बहुतेक जणांचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पोस्ट मिळण्यासाठी क्लास लावलाच पाहिजे का? क्लास लावल्याशिवाय पोस्ट मिळत नाही का? हा प्रश्न सर्वाना पडण्याचे कारण म्हणजे सध्या MPSC/UPSC क्षेत्रात क्लासेसचे प्रचंड मार्केटिंग चालू आहे. निवड झालेल्या प्रत्येक अधिकार्याचा फोटो कोणत्या ना कोणत्या क्लासच्या बॅनरवर असतो. काही क्लासेस वर्तमानपत्रातून भल्या मोठ्या जाहिराती देतात. त्यात निवड झालेल्या बहुतांशी अधिकाऱ्यांची नावे आणि फोटो छापलेले असतात.
महाराष्ट्रभर वितरित होणाऱ्या वर्तमानपत्रात या जाहिराती बघून तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाटते कि निवड झालेले सर्व अधिकारी कोणत्या ना कोणत्या क्लासला होते. परंतु वस्तुस्थिती तशी नसते. बहुतांशी अधिकारी हे बिगर क्लासवाले असतात. मग त्यांचे फोटो क्लासवाले का छापतात? तर त्याचं असं आहे, जेव्हा एखादा विद्यार्थी कोणत्याही क्लासच्या मदतीशिवाय MPSC/UPSC चा अभ्यास करत असतो तेव्हा तो पूर्व आणि मुख्य परीक्षा क्लासच्या मार्गदर्शनाशिवाय पास होतो. परंतु मुलाखतीसाठी त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. मग क्लासवाले मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन करतात. त्यांच्यासाठी mock interviews आयोजित केले जातात. त्याबदल्यात त्यांच्याकडून त्यांचा एक फोटो आणि डिटेल्स घेतल्या जातात. जेव्हा अंतिम निकाल लागतो तेव्हा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांचे फोटो तर क्लासवाल्यांकडे असतात. ते छापले जातात.
विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन मिळालेले असते त्यामुळे ते या गोष्टीला objection घेत नाहीत. परंतु यामुळे लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल होते आणि त्यांचा असा समज होतो कि क्लास लावल्याशिवाय यश मिळत नाही. माझा अनुभव वेगळा आहे. क्लास लावला पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही. परंतु आर्थिक परिस्थिती सक्षम असती तर कदाचित क्लास लावला असता. परंतु क्लासेसची अव्वाच्या सव्वा फी परवडणारी नव्हती. त्यामुळे self study वर भर दिला. राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर सर्वांप्रमाणे मीही एखाद्या क्लास चा मार्गदर्शन वर्ग join करायचे ठरवले. जेव्हा मुख्य परीक्षा संपते तेव्हा लगेच मुलाखतीचे मार्गदर्शन वर्ग सुरु होतात. राज्यसेवा 2016 ची मुख्य परीक्षा सप्टेंबर मध्ये संपली. एक महिन्याने STI मुख्य परीक्षा होती. मी आणि माझे दोन मित्र मुलाखत मार्गदर्शनासाठी एका क्लासमध्ये गेलो. माझा first key नुसार स्कोअर 350, आणि त्या दोन मित्रांचा 340, 373. आम्ही तिघेही मुलाखतीसाठी मार्गदर्शन पाहिजे म्हणून गेलो होतो. जातानाच एका मित्राने सांगितले कि 350 मार्क्स ला तुला तिथे मार्गदर्शन मिळणार नाही. मार्क्स वाढवून सांग. पण मला ते योग्य वाटले नाही. आम्ही तिघांनीही खरे स्कोअर सांगितले. तर त्या सरांचा रिस्पॉन्स वेगवेगळा होता.
- 340 मार्क्स - तुमची निवड होणार नाही. तुम्ही मुलाखतीची तयारी करू नका.
- 350 मार्क्स- तुम्हाला एखादी क्लास2 वगैरे मिळू शकते. तुमचा स्कोअर कमी आहे. सध्या तुम्ही STI मुख्य परीक्षेची तयारी करा.
- 373 मार्क्स- तुमचा स्कोअर खूप चांगला आहे. तुम्हाला 100% Dy.SP मिळेल. तुम्ही उद्यापासून जॉईन करा.
अजून second answer key यायची होती. तरी निष्कर्ष कसा काय काढला. आणि 340 वाला पास होईल कि नापास हे आधीच कसे ठरवले. अजून लेखी पेपरचे 100 मार्क्स बाकी होते. त्यात कुणाची किती क्षमता आहे याचा निर्णय क्षमता तपासण्याआधीच कसा होऊ शकतो. मार्गदर्शन करायचे कि नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता, पण प्रयत्नच करू नका असे सांगून नाउमेद का करायचे? मला राज्यसेवाच करायची असताना STI करायचा सल्ला देणे योग्य आहे का? जिथे मला 350 मार्क्स ला क्लास 2 पोस्ट मिळू शकते असे त्यांना वाटत होते. माझी लेखी परीक्षेची आणि मुलाखतीची क्षमता आधीच कशी तपासली? मग प्रत्यक्षात काय झालं? मला लेखी पेपरला 61 आणि मुलाखतीत 70 मार्क्स मिळाले. Second answer key ने 350 वरून 354 स्कोर झाला. एकूण बेरीज 485 होऊन गट विकास अधिकारी हि क्लास 1 पोस्ट मिळाली. महत्वाची गोष्ट हि कि मार्क्स चांगले असतील तरच त्या विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता आणि कमी असतील तर दुजाभाव का ? ज्यांनी मला त्यावेळी मुलाखतीसाठी मार्गदर्शन करायला आत्मीयता दाखवली नाही त्यांनी माझे फोटो मात्र छापले...आमचा विद्यार्थी म्हणून. काही क्लास चालकांनी प्रामाणिक मदत केली. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. इथे कुणाचाच उल्लेख करत नाही. मला मार्गदर्शन करणारे आणि न करणारे सर्वांबद्दल मला खूप आदर आहे. यश मिळाले तरी मी जमिनीवर आहे. फक्त भावी पिढीची दिशाभूल होऊ नये यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. यात कुणावरही टीका करण्याचा, कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही. क्लास लावावा कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मी क्लास लावला नव्हता हि पण वस्तुस्थिती आहे.
Wednesday, January 17, 2018
पुण्यश्लोक अहील्याबाई होळकर यांच्यावरील व्याख्यान...
व्याख्यान बघिण्याकरीता खालील लिंक वर क्लीक करा
https://youtu.be/7BeJDW6aTjA
https://youtu.be/7BeJDW6aTjA
Sunday, December 31, 2017
Saturday, December 23, 2017
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक कर्जबाजारी...
महाराष्ट्रात कोणताही नागरिक हा कर्जमुक्त नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर ४० हजार रुपये कर्ज आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर स्वताचे वयक्तिक कर्जा व्यतिरिक्त शासनाने घेतलेल्या कर्जाचे प्रत्येक नागरिकावर ४० हजार रुपये कर्ज आहेे.
.
सौजन्य: ABP MAZA
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर स्वताचे वयक्तिक कर्जा व्यतिरिक्त शासनाने घेतलेल्या कर्जाचे प्रत्येक नागरिकावर ४० हजार रुपये कर्ज आहेे.
.
Thursday, August 24, 2017
Sunday, August 6, 2017
आज माणसातील माणुसकी संपत चालली आहे?...
आज एक बातमी वाचुन मनाला धक्काच बसला. एक व्यक्ती सर्वांसमोर आपल्या अर्धांगणीला म्हणजेच आपल्या पत्नीला बाहेर मैदानात खचुन आणतो, मारहान करतो. तो इथपर्यंतच थांबत नाही तर तिच्यावर चाकुने ने वार करायला पुढे सरसावतो. मात्र त्या मैदानात उपस्थित असलेली गर्दी फक्त बघ्याची भुमिका घेत होती. व या यापेक्षा वाईट म्हणजे ते गर्दीतील काही व्यक्ती तर या प्रसंगाच चित्रिकरण करण्यात व्यस्त होती.
त्या स्त्रीला पतीची मारहान चालु असताना तेथे असलेल्या गर्दीतील व्यक्ती कोणत्याही प्रकारची माणुसकी न दाखवता कोणीच मध्यस्थी करत नव्हती. यावरुन आपल्यातील माणुसकी संपली आहे का हा प्रश्न निर्मान होतो. तेव्हा त्या गर्दीत माणुसकी असणार्या व्यक्तींनी तेथे धाव घेतली. त्यांना बघुन पोलीसांनी सुद्धा तत्काळ धाव घेतली. त्या मदतीला धावुन गेलेल्या व्यक्तींमुळे कदाचित आज आपल्यात थोडी तरी माणुसकी शिल्लक आहेत अस म्हणता येण्याकरीता जागा शिल्लक राहीली...
Thursday, August 3, 2017
Monday, July 17, 2017
छत्रपती शिवाजी महाराज...
@@!!""जर "शिवाजी" हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते""!!@@
(लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड)!!
@@!!""भारताला जर स्वातंत्र्य मिळवुन दयायचं असेन तर एकच पर्याय आहे---शिवाजी""!!@@ (नेताजी सुभाषचंद्र बोस)
@@!!""नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर'ची गरज नाहीए तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे""!!@@
(अँडॉल्फ हिटलर)
@@!!""शिवाजी हे फक्त नाव नाहीतर शिवाजी ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो""!@@
(स्वामी विवेकानंद)
@@!!"" जर शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास 'सुर्य' संबोधले असते""!!@@
(बराक ओबामा,अमेरिका)
@@!!" जर शिवाजी महाराज अजुन १० वर्षे जगले असते तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता"!@@
(इंग्रज गव्हर्नर)
@@!!"" काबुलपासुन कंदहारपर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली.इराक,इराण,तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं पण हिंदोस्थानात मात्र आम्हाला "शिवाजी" ने रोखलं! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला!
या अल्लाह!! दुश्मन दिया भी तो कौण दिया?
"सिवा भोसला"जैसा दिया.
अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है""!!@@
(छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पढताना काढलेले उदगार,संदर्भ-खाफिखानाची बखर)
@@!!"" उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा.
मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता""!!@@
(शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)
@@!!"" क्या उस गद्दारे दख्खनसे "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है इस दरबार में.लानत है ऐसी मर्दानगी पे""!!@@
(बडी बेगम अलि आदिलशाह)
@@!!"" Shivaji,The King of India"!!@@
(London Gadget-१७ व्या शतकातलं युरोप खंडातील Top वर्तमानपत्र)
वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो,जागतिक दर्जाचे योद्दे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच!!!
महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय बाकि सर्वजण हे परकिय सरदार आणी त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते!!
ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणी त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता तर तो "अबू तालिबानचा नवाब होता,तुर्कस्तानचा नवाब होता!! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता.त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता.
पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणी काही कळायच्या आत पसार झाले! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकि भिती घेतली कि शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाहीए असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता!!
तो बेहलोलखान पठाण,सिकंदर पठाण,चिडरखाण पठाण इ.ज्यांना महाराजांनी रणांगणावर धु दु धुतलं हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते!!
दिलेरखान पठाण!! मंगोलियन सरदार,मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा!
महाराजांनी याचा पराभव केला!!
सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते,इराणचे शुर सरदार होते! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं!!
उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला,तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता म्हणजे आत्ताच्या रशियाचा!! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली.कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव!!(१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणी या ३०,००० पैकि एकही जिवंत राहीला नाही आणी १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही)
१७व्या शतकात युरोप खंडित "लंडन गँझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं.जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर पहिली बातमी छापली आणी त्यात महाराजांचा Shivaji,The King of India असा उल्लेख केला!!
व्हिएतनाम या छोट्याशा राष्ट्राने (पुण्याएवढया) बलाढय अमेरिकेवर विजय मिळविला कारण "शिवाजी"!! तर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्षांनी (नाव आठवत नाहीए) त्यांच्या समाधीखाली असं लिहीलंय कि," शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे विश्रांती घेतोय)!
औरंगजेबाने ऐन उमेदीची २७ वर्षे महाराष्ट्रात वाया घालवली.होय! वायाच घालवली कारण त्याने २७ वर्षे मराठयांशी निकराची झुंज दिली पण १ इंच महाराष्ट्राची भुमी तो जिंकु शकला नाही,कदाचित ही २७ वर्षे त्याने दुस-या प्रदेशांवर घालवली असती तर तो अर्ध्या पृथ्वीचा तो अधिपति झाला असता इतक्या बलाढय फौजेचा तो बादशाह होता!!
मग सांगा का छत्रपति शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावरील योद्दे नव्हते!
नक्किच महाराज हे जागतिक दर्जाचे सेनानी होते हे यावरुन सिध्द होतंय!!
पण दुर्देव अख्या जगाला माहीती आहे महाराज काय होते ते पण भारतातील जनतेलाच माहीती नाही कारण तसं असतं तर महाराजांना आम्ही जाती आणी धर्माच्या बंधनात अडकवुन मर्यादित ठेवलं नसतं!!!!!
पण आता हिथुन पुढे ही चुक करायची नाही तर महाराजांचा उल्लेख करताना फक्त मराठयांचा राजा असं न करता "हिंदुस्थानचा सम्राट,शहेनशाह-ए-हिंदुस्थान,भारताचा राजा" अशिच करावी ही विनंती कारण आपल्याला महाराजांना जागतिक स्तरावर न्यायचंय.!!
🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏
(स्त्रोत : whatsup)
Subscribe to:
Posts (Atom)
तुम्हाला हे वाचायला आवडेल...
निरागस प्रेम...
"प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...
-
🌹 *गुरू - शिष्य* 🌹 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜 गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञ...
-
*👉चुक कुठे झाली ...* _लेखक- अनामिक._ एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणीक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सा...





