आज एक बातमी वाचुन मनाला धक्काच बसला. एक व्यक्ती सर्वांसमोर आपल्या अर्धांगणीला म्हणजेच आपल्या पत्नीला बाहेर मैदानात खचुन आणतो, मारहान करतो. तो इथपर्यंतच थांबत नाही तर तिच्यावर चाकुने ने वार करायला पुढे सरसावतो. मात्र त्या मैदानात उपस्थित असलेली गर्दी फक्त बघ्याची भुमिका घेत होती. व या यापेक्षा वाईट म्हणजे ते गर्दीतील काही व्यक्ती तर या प्रसंगाच चित्रिकरण करण्यात व्यस्त होती.
त्या स्त्रीला पतीची मारहान चालु असताना तेथे असलेल्या गर्दीतील व्यक्ती कोणत्याही प्रकारची माणुसकी न दाखवता कोणीच मध्यस्थी करत नव्हती. यावरुन आपल्यातील माणुसकी संपली आहे का हा प्रश्न निर्मान होतो. तेव्हा त्या गर्दीत माणुसकी असणार्या व्यक्तींनी तेथे धाव घेतली. त्यांना बघुन पोलीसांनी सुद्धा तत्काळ धाव घेतली. त्या मदतीला धावुन गेलेल्या व्यक्तींमुळे कदाचित आज आपल्यात थोडी तरी माणुसकी शिल्लक आहेत अस म्हणता येण्याकरीता जागा शिल्लक राहीली...
No comments:
Post a Comment