Popular Posts

Monday, August 24, 2015

निरागस प्रेम...




   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. असच काही प्रेमाच नात त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये होत . ते दोघही अवघ्या दहाव्या वर्गामध्ये शिकत होते. वय जेमतेम १६-१७ वर्ष.ह्या निरागस वयामध्ये कोण आपल आणि कोण दुसर हे ही सहजासहजी कळतही नसत. दोघही एकाच वर्गात शिकत असताना सुद्धा एकमेकांना ओळखत नव्हते. शाळेच्याच एका कार्यक्रमामध्ये दोघांचीही ओळख झाली. ती ओळख पुढे वाढतच गेली, पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली , अनेक विषयावर चर्चा होउ लागली. यातुनच त्यांची मैत्री ही अधिकच घट्ट होत होत गेली .एकमेकांची मोबाईल नंबर पण त्यांनी शेअर करुन घरच्यांच्या लपुनछपुन ते एकमेकांसोबत बोलु लागली ,वर्गातील मुल-मुली पण त्या दोघाच्याबाबत आपपसात चर्चा करु लागली. त्या दोघांची मैत्री ही प्रेमात रुपांतर कधी झाली हे त्या दोघांना कळलच नाही.
                  ती दोघ आता जिवणातील अविस्मरणीय क्षण जगत होती त्यांना माहीत होत व ही क्षण पुन्हा येणार नाही त्यामुळे बिंधास्त अस जिवण जगत होती. त्यांना जगाची काहीही पर्वा नव्हती , कोण आपल्याबाबत चर्चा करत आहे, कोण आपली टिंगल उडवत आहे आणि कोण आपल्या मागावर आहे याची काहीही चिंता त्या दोघांनाही नव्हती ती दोघ फक्त प्रेम करु इच्छित होती. पण हे प्रेम हे अत्यंत निरागस, निस्वार्थी प्रेम होत या या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. जणु प्रेम म्हणजे देवाकडुन मिळालेली देण अश्याच प्रकारे ती दोघही जिवण जगत होती परंतु या प्रेमाचा परिणाम त्यांच्या शिक्षनावर काय होणार , त्याच्या जिवणावर काय होणार याबाबत विचार करायला दोघही तयार नव्हती कारण दोघही एकंमेकांच्या प्रेमात आकंठ डुबायला लागली होते. परंतु समाजात निरागस अस्या प्रेमाला जागा नसते अस म्हणतात.
                    म्हणुनच काय तर या दोघांच्या प्रेमाची बातमी ही मुलीच्या घरी पोहचली. ती बातमी पोहचल्यानंतर मुलीच्या घरचे अत्यंत संतप्त झाले. तो मुलगा असलेल्या ठीकाणी ते मुलीचे कुटुंबीय आले , त्त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तो मुलगा त्यांच्या जवळ गेला व आपण कोण आहात म्हणुन विचारु लागला. त्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी मुलीच्या कुटुबियांनी त्याच्या कानाखाली एक जोरात चपराक लगावली. त्याने मी काय केल म्हणुन विचारल तेव्हा त्याला ते त्या मुलींचे कुटुबिय असल्याचे कळले. त्याची खुप घाबरगुंडी उडाली, त्याला रडु कोसळल , त्याने त्यांची माफी मागण्याचा प्रतत्न केला. पण त्याची बाजु ऐकुन घेण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीही नव्हते, सर्व जण त्याच्यावर तुटुन पडले व त्यावा लाथा बुक्क्यांनी मारु लागले. तो रडत होता , गयावया करत होता, सोडा मला सोडा म्हणुन ओरडत होता पण त्या निर्दयी लोकांना त्या गयावया करण, रडण, मला माफ करा मला सोडुन द्या यापुढे असे होणार नाही असे ओरडत होते यातील एकही शब्द ऐकु येत नव्हता.
                      काही वेळानंतर त्याची मार खाण्याची क्षमता संपली व तो बेशुद्ध होउन त्या रस्त्यावर पडला. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रस्त्यावर तसेच सोडुन मुलीचे ते कुटुंबीय आपल्या घरी निघुन गेले. तो १६-१७ वर्षाचा निरागस मुलगा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता पण त्याला उचलायला कोणही समोर आल नाही. काही वेळाने त्या मुलांच्या कुटुंबियांना माहीती पडल व त्यांनी त्या मुलाला उचलुन दवाखाण्यात नेल. मुलांच्या कुटुंबिय पण त्या मुलींच्या कुटुबियाना मारायला निघाले पण त्या मुलाच्या वडीलांनी त्यांना थांबवल. व झाल ते झाल पण आता हे प्रकरण आपल्याला वाढवायच नाही आहे कारण हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचल्यास माझ्या मुलाच जिवण हे उद्वस्त होउ शकत म्हणुन आपल्या शांत राहायच आहे. पण मुलींच्या कुटुबियांनी हा विषय इथेच बंद न करता त्या मुलीचे शिक्षन सोडवले व त्या मुलीवर अनेक निर्बंघ लादल्या गेले. व त्यानंतर कधीही त्या मुलाची व मुलीची भेट झाली नाही.........
                    या निरागस, निस्वार्थी प्रेमाचा असा शेवट का झाला की त्या मुलाला दवाखान्यात अति दक्षता कक्षा मध्ये रहाव लागल, मुलीला आपल्या हक्काच्या शिक्षनापासुन मुकाव लागल. आजचे पालक एवढे निर्दयी आहेत का ? की ते एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलाला एवढ बेदम मारहान करु शकतात , आपल्या स्वताच्या मुलीला शिक्षण सोडण्यास कारणीभुत ठरु शकतात , आपल्या मुलीवर अनेक निर्बंध घालु शकतात....
खर तर हा प्रश्न दोघांनाही समजुत देउन, शिक्षकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लावुन, किंवा दोन्ही कुटुंबियांनी आपपल्या मुलांना समज देउन, प्रेमळ अशी दमदाटी करुन सोडविता आला पण हा प्रश्न सोडवण्या करीता जो काही मार्ग अवलंबविला गेला तो दोन निरागस मुलांच्या जिवणाचा अस्त ठरला. आपला समाज हा अत्याधुनिक जगाबरोबर जगतो आहे की तो आजही सोळाव्या सतराव्या शतकात जगत आहे हा मोठा प्रश्न आहे.......



संजय राजु कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com


Sunday, August 23, 2015

आपले लिखान पाठवा...

कृपया तज्ञ, लेखक, अभ्यासु व्यक्तींनी आपले लेख असल्यास आम्हाला नक्की पाठवा. प्रसिद्दी योग्य मजकुराला आम्ही तुमच्या नावासहीत आमच्या ब्लाग वर प्रसिद्ध करु...

साहीत्य पाठविण्याकरिता आपण संपर्क फार्म चा उपयोग कर शकता किंवा Email: S.r.kokare1992@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवु शकता...

Saturday, August 22, 2015

नेत्याईसाठी बी CET चालु कराले पाहीजे....


   गण्या रस्त्यान चालला होता तेवढ्यात त्याले राम्या येताना दिसते,
   गण्या: कुठ चाल्ला बे!
   राम्या: कुठ नइ मयी CET ची परिक्षा आहे न त्याचेच पुस्तक आणाले चाल्लो.
   गण्या: अबे राम्या हे CET म्हणजे काय होते रे!
   राम्या: काय राजा गण्या तुले CET  म्हणजे काय महीत नही काय, अबे माय d.ed. झाल न् झाल नोकर्याच संपल्या राज्या मग सरकारन पात्रता परिक्षा ठेवली हुशार तपासुन नोकरी लावासाठी त्याच परिक्षाले राज्या CET म्हणते.
   गण्या: हुशार पोरं तपासुन लावा साठी हे पात्रता परिक्षा होय मग? काय रे मग तु कायले चाल्ला मग तिथ?
   राम्या: तुले मघाशीच त् सांगतल ना बे CET ची परिक्षा द्यायाची हाय म्हणुन त्याइचे पुस्तक आणाले चाल्लो म्हणुन
   गण्या: नइ ते बरोबर हाय तुय, पण हे CET परिक्षा त् हुशार पोर तपासुन लावते ना मग तु कायले चाल्ला बे ते परिक्षा द्याअले.
   राम्या: काय राज्या मले डायरेक्ट बह्याड म्हणुन राह्यला तु!
   गण्या: मजाक करुन राह्यलो ना बे तुई. आता तुई मजाक नई कराव त कोणाची कराव राज्या.
  राम्या: थे बी बरोबर हाय म्हणा, आपलेले अशेच मजाक करत दिवस काढा लागते.
  गण्या: काय बे राम्या ह्या आमदारायसाठी, खासदारायसाठी कोण नई बे CET ठेवत हे सरकार
  राम्या: त्यान काय हुयीन बे,
  गण्या: ह्या नेत्याइतल्या बह्याडाईले बाहेर काढुन हुशारायीले शोधुन आमदार, खासदार तरी करता येइन बे
   राम्या: बरोबर हाय तुय! पण नेमक त्यान काय हुयीन.
   गण्या: जस बह्याड पोराईतले हुशार पोर ले पारखुन चांगला मास्तर तयार करते हे सरकार, तसच मग ह्या नेताईतले बह्याड नेत्याइले बाहेर काढुन हुशार नेत्याले आमदारकी, खासदारकी उभ करता ईन मग आपला देश बी लई पुढ जईन राज्या.
   राम्या: खर बोलला राज्या तु गण्या....


संजय  कोकरे
9561730189
Www.sanjaykokre.blogspot.com

Sunday, August 16, 2015

जमिण अधिग्रहण कायदा...

जमिन अधिग्रहण कायदा.......

                   सध्या देशाच्या राजकारणामध्ये भुमिअधिग्रहण कायद्या बाबत चर्चेला विधान आले आहे. जमिन अधिग्रहन  म्हणजे देशाच्या, राज्याच्या विविध विभागातील पायाभुत आणि आर्थव्यवस्थेच्या समृद्धीसाठी जमिन ताब्यात घेण्याची प्रकीया होय. पण ह्या मध्ये जमिन अधिग्रहीत करते वेळी जमिन मालकाला योग्य तो मोबदला मिळलेच अस नाही. २०१३ या वर्षाअगोदर अधिग्रहीत करण्यात येण्यार्या जमिनी ह्या भारतात लागु असणार्या " जमिन अधिग्रहन कायदा १८९४" या  वसाहतवादी ब्रिटीष राजवटीमध्ये तयार  या आलेल्या कायद्या प्रमाने करण्यात येत होत्या. या कायदानुसार सार्वजनिक हेतु साठी   खाजगी जमिन सरकार किंवा कंपनी यांना अधिग्रहीत करण्याचा अधिकार होता. या कायद्यामध्ये स्वातंत्रयोत्तर काळामध्ये बदलत्या स्वरुपानुसार वेळोवेळी बदल केले गेले परंतु  जमिन अधिग्रहन करण्याची पद्धत मात्र इग्रजांच्या काळात होती तशीच राहली.
                     संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जमिन अधिग्रहन पुनर्स्थापन, पुनर्वसन, पारदर्शकता आणि योग्य हक्क मिळण्याचा हक्क, कायदा २०१३ (The right to fair compensation and transparency   in land acquisition, Rehabilitation and resettlement act 2013) २९ आगस्ट २०१३ ला लोकसभेत मंजुर करण्यात आला. आणि त्यानंतर लगेच म्हणजे सहा दिवसांनी ४ सप्टेबंर २०१३ ला राज्यसभेने मंजुर करुन हा कायदा १ जानेवारी २०१४ ला भारतामध्ये लागु झाला. या कायद्यामध्ये जमिन अधिग्रहीत करण्यासाठी खालील तरतुदी केलेल्या आहेत..
      या कायद्या नुसार जमिन अधिग्रहण होत असणार्या जमिन मालकाला ग्रामीन भागात बाजारभावाच्या चार पट तर शहरी भागात बाजारभावाच्या दोन पट देण्यात येत असे.
    जमिन अधिग्रहीत केल्यानंतर जमिनाचा  वापर न केल्यास किंवा जमिन तशीच पडुन राहल्यास ती जमिन जमिन मालकाला किंवा राज्य भु बँकेला परत करण्याची तरतुद करण्यात आली आहे.
     जमिन अधिग्रहीत करण्यात आल्यामुळे जमिनवरील उत्पन्न कर किंवा मुद्रांक शुल्क लागु होणार नाही.
      जमिन मालकालाच नाही तर जमिनी वर ज्यांची ज्यांची उपजिवेकी अवलंबुन आहे त्या सर्वांना नुकसान भरपाईची तरतुद या कायद्या मध्ये आहे.
      राखीव क्षेत्रातील जमिन ही ग्रामसभेची मान्यता मिळेपर्यंत ताब्यात घेता येणार नाही.
     जोपर्यंत पुनस्थापना आणि पर्यायी जागा किंवा पुर्ण मोबदला जमिन मालकास मिळणार नाही तोपर्यंत अधिग्रहीत जमिनीवरुन कोणालाही काढता येणार नाही.
     प्रत्येक प्रकल्पामध्ये भुमिहीन होणारे आणि अनुसचित जाती, जमाती यांच्या  मालकीची जमिन अधीग्रहीत होत असेल तर त्यांना तेवढी जमिन किंवा दोन आणि अर्धा एकर यापेक्षा जी कमी आहे ती दिली जाईल.
    खाजगी सार्वजनिक प्रकल्पांसाठी ७० % किंवा खाजगी कंपनीसाठी ८० %  जमीन अधिग्रहीत करण्यासाठी जमिन मालकाची परवानगी हवी.
                    परंतु नविन लोकशाही आघाडी (NDA) सरकाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी अध्यादेश काढुन २०१३ ला आलेल्या कायद्यामध्ये काही बदल केलेले आहेत.
लोकशाही आघाडी सरकारने पुढील प्रमाने काही बदल केलेले आहेत.
    अध्यादेशाने सहमतीची गरज, तद्न्याकडुन परिक्षन, सामाजिक परिणाम मुल्यांकन , बहुपिक शेत जमिन या बाबी  विशेष वर्गवारी प्रकल्प कलम १० अंतर्गत निर्मान करुन वगळण्यात आल्या.
या प्रकल्पामध्ये १.ग्रामीन पायाभुत क्षेत्र २.सरंक्षन ३. औद्योगिक मार्गिका  ४. परवडणारी गृह ५. पायाभुत प्रकल्प - सार्वजनिक-खाजगी भागीदारीसह यामध्ये जमिन अधिग्रहीत असताना वर उल्लेख केलेल्या तरतुदी लागु नसतील.
    अधिग्रहीत केलेली जमिन ही पाच वर्षापासुन जर विना वापर पडलेली असेल तर ती  पाच वर्षानंतर किंवा प्रकल्प स्थापन करत असताना  ठरवलेलेली कालमर्यादा या पेक्षा जी नंतर ची असेल  असा बदल करण्यात आला असुन त्यानंतर ती जमिन मुळ मालकाला किंवा भु बँके मध्ये जमा करण्यात येईल.
    जमिन अधिग्रहन कायदा २०१३ मधुन विशिष्ट अशा १३ कायद्यांना सुट देण्यात आली होती . कायदा लागु झाल्यापासुन एका वर्षाच्या आत सुट देण्यात आलेल्या कायद्यांना  २०१३च्या कायद्यानुसार जमिन अधिग्रहीणाच्या बाबतीत मोबदला, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना  या तरतुदी लागु कराव्यात ही तरतुद होती. परंतु २०१५ च्या अध्यादेशाने हे सुट देण्यात आलेले १३  कायदे वगळण्यात आले आहे.
    १८९४ भुमि अधिग्रहण या कायद्यानुसार  अधिग्रहीत केलेल्या एखाद्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा किंवा मोबदला दिला गेला नसेल तर कायद्याच्या तरतुदी त्या जमिनी साठी लागु होतात जर ती जमिन ही २०१३ चा कायदा पारित होण्याच्या पाच वर्ष अगोदर अधिग्रहीत झाली असेल.
    जमिन अधिग्रहनाच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणुन जमिन ही ठराविक मुदतीच्या कराराने देण्यात यावी किंवा तिथे जमिन अधिग्रहीत केलेल्या जमिनीमध्ये किंवा तेथे निर्मान होणार्या प्रकल्पामध्ये फायद्यामध्ये जमिन मालकाला काही विशेष टक्के वाटा देण्यात यावा.
             
संदर्भ :( राजपथ टाईम्स जुलै २०१५)

Saturday, August 15, 2015

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला..

धनगर समाजाच्या आरक्षन विषयक प्रश्नाबाबत युती सरकार उदासिन...


                 धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षन लागु करण्याचे आश्वासन युती सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर धनगर समाजाला दिल. हेच आश्वासन भाजपाने आपल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पण जाहीर केल होत. त्यामुळेच धनगर समाजाने भरघोस असे मतदान  भाजपा च्या उमेदवारांना केल. त्यामुळचे राज्यात सत्तांत्तर होउन युती सरकार सत्तेत आल. पण आज या युती सरकारला सत्तेत येउन दहा महीण्यापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी भाजपा सरकारला धनगर समाजाला आश्वासना देण्या खेरीज दुसर काहीही देता आलेल नाही. त्यामुळे युती सरकारला धनगर समाजाचा विधानसभा निवडणुकीनंतर विसर पडला की काय? हा प्रश्न जनसामान्यांसाठी संशोधनाचा विषय ठरला आहे.
                धनगर समाजातील १६ शिलेदार ज्या वेळेस बारामतीला उपोषनास बसले होते त्या वेळेस  त्यावेळेसच भाजपा प्रदेशाध्यक्ष व आजचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांनी स्वता जाउन भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आल्यास धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवु अस आश्वासन दिल होत. तसेच ४ जानेवारीला सपन्न झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्या मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महाधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करुन धनगर समाजाचा प्रश्न हा १५ दिवसाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करु असे जाहीर आश्वासन दिले होते.
                   परंतु मा. मुख्यमंत्री साहेंबांनी धनगर समाजाच्या नागपुर मेळाव्यामध्य दिलेल्या जाहीर आश्वासनाला आज ६-७ महीने झाल्यानंतरही धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत कोणताही निर्णय झालेला दिसत नाही आहे. त्यामुळे एका भोळ्याभाबड्या समाजाला फक्त आश्वासन देत त्या समाजाची युती सरकार फसवणुक तर करु पाहत नाही आहे ना ? हा प्रश्न जनसामान्याच्या मनात निर्मान होत आहे. कारण हा प्रश्न फक्त धनगर समाजाचाच नसुन युती सरकार वर विश्वास ठेवणार्या महाराष्ट्रातील सर्वच समाजाचा असल्यामुळे धनगर समाजाला आतापर्यंत न्याय मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वच समाजाचा युती सरकार वरील असंतोष वाढीस जात आहे याची दक्षता युती सरकारने घ्यायला हवी.
                   धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्ष हा सकारात्मक दिसत असुन त्यांनी हा प्रश्न विधानसभेत अनेक वेळा उपस्थित केलेला आहे.  त्यामुळे धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाचा प्रश्न  सत्ताधारी पक्ष सोडवण्यास विलंब का करत आहे ? हा जनसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षन विषयक प्रश्नाबाबत बीजेपी सरकार खरेच सकारात्मक आहे की फक्त वेळकाढु धोरण राबवुन धनगर समाजाची फसवणुक करु पाहत आहे ? या बाबत धनगर समाजाने वेळीच चिंतन करुन वेळीच सावधान भुमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन धनगर समाज आपली फसवणुक होण्याची शक्यता असेल तर आपला त्यापासुन बचाव करु शकेल अशी  आशा महाराष्ट्रातील सामान्य जनता बाळगु लागली आहे....

लेखक:👇👇👇
संजय रा कोकरे
अमरावती
मो.नं: 9561730189
Www.sanjaykokre.blogspot.com
तुम्ही मला twitter ला फोलो करु शकता.
Www.twitter.com/kokaresanjay
🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...