Popular Posts

Wednesday, October 1, 2014

"देशाचे राष्ट्रगीत महत्वाचे की राजकीय नेत्याचे भाषण?"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकींचे पडझम सर्वत्र वाजत आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन यावा म्हणुन प्रचार सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे व प्रचार सभेचा आवाज अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावा याकरता न्युज चॅनेल त्यांचे थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही परिसरात घेतली जाणारी प्रचार सभा ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे व त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावापर्यंतच्या लोकापर्यंत पोहचत आहे. प्रत्येक पक्षाचा पक्षश्रेष्ठी आपल्या भाषणातुन आपल्या पक्षाचा लेखाजोगा मांडत असतो व भविष्यामध्ये सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यास त्याचा पक्ष कोणत्या गोष्टी करण्यावर भर देणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दि. २८ सप्टेंबर २०१४ ला संध्याकाळला मा. राज ठाकरे यांची मुंबई येथे प्रचार सभा होती. त्या सभेमध्ये मा. राज ठाकरेंचे भाषन चालु होते व बर्याच मराठी न्युज चॅनल वर त्याचे थेट प्रक्षेपण चालु होते. मा. राज ठाकरे साहेबांचे भाषन संपल परंतु तेथील व्यासपिठावर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल असे जाहीर करण्यात आले. मी राष्ट्रगीताकरता उभा राहणारच तेवढ्यात त्या न्युज चॅनेलने त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपन बंद केले आणि आपले नविन बातमीपत्र सुरु केले. माझ्या मनात विचार येत होता की राजकीय पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे अर्धा ते एक तासाचे भाषणाचे प्रक्षेपण दाखवण्यात न्युज चॅनल काही अडचण नव्हती मग ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यात न्युज चॅनेल ला काय अडचण होती. एखाद्या राजकीय पक्षाचा पक्षेश्रेष्ठीचे भाषन भारताच्या राष्ट्रगीतापेक्षा न्युज चॅनेलला मोठे वाटते की काय? हा प्रश्न माझ्याचसाठी नव्हे तर महाराष्ट्रतील जनसामान्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. जी न्युज चॅनल निवडणुक काळामध्ये राजकर्त्यांच्या भाषनाचे थेट प्रक्षेपण करु शकते, राजकीय पक्षाच्या तसेच वेगवेगळ्या सौदर्य प्रसाधनाच्या जाहीराती दाखवु शकतात तेच न्युज चॅनेल ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यास का काटकसर करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेमधील पक्षश्रेष्ठीचे संपुर्ण भाषणाचे थेट प्रक्षेपण करायचे परंतु त्याच सभेतील राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपण बंद करुन नविन बातमीपत्र सुरु करायचे हे कितपत योग्य आहे? देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाचा अभिमान असावा व आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान देशातील प्रत्येक नागरिकाने करावा असे आपणा सर्वांचे मत असते. परंतु देशाच्या राज्यघटनेचा चौथा आधारस्तंभ असलेली मिडीयाच ज्यावेळेस असे क्रुत्य करते त्यावेळेस सामान्य जनतेकडुन काय अपेक्षा करावी हा मोठा प्रश्न निर्मान होतो आहे. ईलेक्ट्रानीक्स मिडीयाला राजकीय पक्ष हा देशाच्या राष्ट्रगीतापेक्षाही मोठा वाटतो का? मिडीयाला आपल्या देशाचा अभिमान आहे की नाही? असे अनेक प्रश्न देशातील सामान्य जनतेच्या मनात निर्मान होत आहे. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...